शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

पुणे जिल्ह्यातील ६५ हजार नागरिकांना मिळणार शरद भोजन योजने अंतर्गत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:23 IST

जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार

ठळक मुद्देयोजनेचा तिसरा टप्पा : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून होणार वाटपखेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार

पुणे : संचाबंदीमुळे वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर मातांना दोनवेळचे जेवण मिळण्यासाठी कागदपत्रे नसणा-यांना देखील अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. जिल्ह्यातील असे गरजु लाभार्भी निश्चित करण्यात आले असून शरद भोजन योजने अंतर्गत जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहिर झाले. यामुळे अनेक कामगार राज्यात अडकुन पडले. काम बंद  पडल्याने तसेच जवळ पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होत होती.  अशापैकी त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, परंतु ते त्यांच्या जिल्ह्याचे असल्याने त्यांना त्याद्वारे जिल्ह्यात लाभ मिळत नव्हता. त्यासाठी कागदपत्रे नसलेल्या आणि रेशन खरेदी करू न शकणा-या नागरिकांना जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.या साठी जिल्ह्यात आठ दिवस सर्वेक्षण करण्यात आले. त्या द्वारे लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तर  काही नागरिकांचे अर्ज अपलोड करणे शिल्लक आहे, असे असले तरी काही काळासाटी हे सर्वेक्षण थांबवून, मंगळवार (दि.२८) पर्यंत घेण्यात आलेल्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांना येत्या १ मे पासून प्रत्यक्षात धान्य वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे..................खेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी आहेत. शिरूरमध्ये ४ हजार १२४ कुटुबांतील ११ हजार २६० नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर नगपालिका हद्दीमध्ये सर्वाधिक जेजुरी नगरपालिका हद्दीमध्ये ६१६ कुटांबातील १ हजार ११३ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात ४ हजार १७ कुटुबांतील ११ हजार १३८ नागरिकांना, हवेलीमधील ३ हजार ४८४ कुटुबांतील ९ हजार २१० नागरिकांना, दौंडमधील १  हजार ८३१ कुटुबांतील ५ हजार ३०७ नागरिकांना, पुरंदरमधील १ हजार ५२१ कुटुबांतील ३ हजार ८८९ नागरिकांना, भोरमधील १ हजार ४९६ कुटुबांतील ४ हजार १०२ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार आहेत................................शरद भोजन योजना गरजुंसाठी लाभाची ठरत आहे. या योजनेच्या तिसरा टप्यात लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून करण्यात येणार आहे.  प्रत्येक व्यक्तीला गहू आणि तांदुळ देण्यात येणार आहे. कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना केलेल्या आहेत.- रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद--------------------------

टॅग्स :PuneपुणेKhedखेडShirurशिरुरJejuriजेजुरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार