शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पुणे जिल्ह्यातील ६५ हजार नागरिकांना मिळणार शरद भोजन योजने अंतर्गत अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:23 IST

जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार

ठळक मुद्देयोजनेचा तिसरा टप्पा : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून होणार वाटपखेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार

पुणे : संचाबंदीमुळे वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर मातांना दोनवेळचे जेवण मिळण्यासाठी कागदपत्रे नसणा-यांना देखील अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. जिल्ह्यातील असे गरजु लाभार्भी निश्चित करण्यात आले असून शरद भोजन योजने अंतर्गत जिल्ह्यातील २४ हजार ३७२ कुटुबांमधील ६५ हजार ७९९ नागरिकांना गहू आणि तांदुळ वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहिर झाले. यामुळे अनेक कामगार राज्यात अडकुन पडले. काम बंद  पडल्याने तसेच जवळ पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होत होती.  अशापैकी त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, परंतु ते त्यांच्या जिल्ह्याचे असल्याने त्यांना त्याद्वारे जिल्ह्यात लाभ मिळत नव्हता. त्यासाठी कागदपत्रे नसलेल्या आणि रेशन खरेदी करू न शकणा-या नागरिकांना जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.या साठी जिल्ह्यात आठ दिवस सर्वेक्षण करण्यात आले. त्या द्वारे लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. तर  काही नागरिकांचे अर्ज अपलोड करणे शिल्लक आहे, असे असले तरी काही काळासाटी हे सर्वेक्षण थांबवून, मंगळवार (दि.२८) पर्यंत घेण्यात आलेल्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांना येत्या १ मे पासून प्रत्यक्षात धान्य वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे..................खेड तालुक्यात सर्वाधिक ४ हजार २३८ कुटुंब लाभार्थी आहेत. शिरूरमध्ये ४ हजार १२४ कुटुबांतील ११ हजार २६० नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर नगपालिका हद्दीमध्ये सर्वाधिक जेजुरी नगरपालिका हद्दीमध्ये ६१६ कुटांबातील १ हजार ११३ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात ४ हजार १७ कुटुबांतील ११ हजार १३८ नागरिकांना, हवेलीमधील ३ हजार ४८४ कुटुबांतील ९ हजार २१० नागरिकांना, दौंडमधील १  हजार ८३१ कुटुबांतील ५ हजार ३०७ नागरिकांना, पुरंदरमधील १ हजार ५२१ कुटुबांतील ३ हजार ८८९ नागरिकांना, भोरमधील १ हजार ४९६ कुटुबांतील ४ हजार १०२ नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये अडीच किलो गहू आणि अडीच किलो तांदुळ असणार आहेत................................शरद भोजन योजना गरजुंसाठी लाभाची ठरत आहे. या योजनेच्या तिसरा टप्यात लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून करण्यात येणार आहे.  प्रत्येक व्यक्तीला गहू आणि तांदुळ देण्यात येणार आहे. कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही आणि योजनेचा गैरवापर होणार नाही याबाबत सूचना केलेल्या आहेत.- रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद--------------------------

टॅग्स :PuneपुणेKhedखेडShirurशिरुरJejuriजेजुरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार