शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

देशात ६१ लाख टन साखरेचे उत्पादन;उत्तर प्रदेश अव्वल,सर्वाधिक कारखाने असणाऱ्या महाराष्ट्राची घसरण

By नितीन चौधरी | Updated: December 17, 2024 09:35 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांची धुराडी सुरू न झाल्याने सुमारे १३१ लाख टन उसाचे गाळप कमी झाले

पुणे : देशात यंदाचा साखर हंगामात ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळपाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह ६१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांची धुराडी सुरू न झाल्याने सुमारे १३१ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. त्यामुळे १३ लाख ५० हजार टन साखर उत्पादन कमी झाले आहे, तर सरासरी साखर उतारा देखील ०.२५ टक्क्याने कमी आहे. आतापर्यंतच्या साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली आहे. येथे आतापर्यंत सुमारे २३ लाख टन उत्पादन झाले आहे, तर महाराष्ट्रात सुमारे १७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षापेक्षा यंदा ३९ लाख टन साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

देशात सर्वाधिक १८३ साखर कारखानेमहाराष्ट्रात सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशात केवळ १२० कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. मात्र, येथे सरासरी साखर उतारा ८.९० टक्के मिळत असल्याने एकूण साखरेचे उत्पादन २२ लाख ९५ हजार टन झाले आहे. मात्र, महाराष्ट्रात सरासरी साखरेचा उतारा ८.१० टक्के इतका कमी असल्याने उत्पादन केवळ १६ लाख ८० हजार टन इतकेच झाले आहे. त्यामुळे सध्या तरी उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राने ११० लाख २० हजार टन साखर उत्पादन घेऊन देशात अव्वल क्रमांक पटकावला होता.

उत्पादनात घट होण्याचा अंदाज

देशभरात आता पडलेली कडाक्याची थंडी आणि दिवसभराचे कडक ऊन पाहता हंगामाअखेर सुमारे २८० लाख टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी ३१९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात ३९ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. अपेक्षित २८० लाख टन उत्पादनाव्यतिरिक्त सुमारे ४० लाख टन साखरेचा वापर इथेनॉलनिर्मितीसाठी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

 

साखरेच्या किमान विक्री दरातील वाढ आणि साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरातील वाढ या साखर उद्योगाच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केल्याने ते मार्गी लागले आहेत. याबाबत पुढील दोन ते तीन आठवड्यांत निर्णय होईल. पुढील जानेवारीअखेर झालेल्या साखर उत्पादनाचा आढावा घेऊन साखर निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर योग्य तो निर्णय होण्याची शक्यता आहे. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस