शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

देशात ६१ लाख टन साखरेचे उत्पादन;उत्तर प्रदेश अव्वल,सर्वाधिक कारखाने असणाऱ्या महाराष्ट्राची घसरण

By नितीन चौधरी | Updated: December 17, 2024 09:35 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांची धुराडी सुरू न झाल्याने सुमारे १३१ लाख टन उसाचे गाळप कमी झाले

पुणे : देशात यंदाचा साखर हंगामात ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळपाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह ६१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांची धुराडी सुरू न झाल्याने सुमारे १३१ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. त्यामुळे १३ लाख ५० हजार टन साखर उत्पादन कमी झाले आहे, तर सरासरी साखर उतारा देखील ०.२५ टक्क्याने कमी आहे. आतापर्यंतच्या साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली आहे. येथे आतापर्यंत सुमारे २३ लाख टन उत्पादन झाले आहे, तर महाराष्ट्रात सुमारे १७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षापेक्षा यंदा ३९ लाख टन साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

देशात सर्वाधिक १८३ साखर कारखानेमहाराष्ट्रात सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशात केवळ १२० कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. मात्र, येथे सरासरी साखर उतारा ८.९० टक्के मिळत असल्याने एकूण साखरेचे उत्पादन २२ लाख ९५ हजार टन झाले आहे. मात्र, महाराष्ट्रात सरासरी साखरेचा उतारा ८.१० टक्के इतका कमी असल्याने उत्पादन केवळ १६ लाख ८० हजार टन इतकेच झाले आहे. त्यामुळे सध्या तरी उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राने ११० लाख २० हजार टन साखर उत्पादन घेऊन देशात अव्वल क्रमांक पटकावला होता.

उत्पादनात घट होण्याचा अंदाज

देशभरात आता पडलेली कडाक्याची थंडी आणि दिवसभराचे कडक ऊन पाहता हंगामाअखेर सुमारे २८० लाख टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी ३१९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात ३९ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. अपेक्षित २८० लाख टन उत्पादनाव्यतिरिक्त सुमारे ४० लाख टन साखरेचा वापर इथेनॉलनिर्मितीसाठी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

 

साखरेच्या किमान विक्री दरातील वाढ आणि साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरातील वाढ या साखर उद्योगाच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केल्याने ते मार्गी लागले आहेत. याबाबत पुढील दोन ते तीन आठवड्यांत निर्णय होईल. पुढील जानेवारीअखेर झालेल्या साखर उत्पादनाचा आढावा घेऊन साखर निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर योग्य तो निर्णय होण्याची शक्यता आहे. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस