शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

‘ॲग्रिस्टॅक’ला अखेर मुहूर्त ! राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळाली ओळख

By नितीन चौधरी | Updated: January 28, 2025 11:35 IST

राज्यात आतापर्यंत ६ लाख ८८ हजार १०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ६ लाख १ हजार २०८ शेतकऱ्यांना क्रमांक मिळाला आहे.  

नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रिस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कृषी सहायकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यात आतापर्यंत ६ लाख ८८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील ६ लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. यासाठी ॲग्रिस्टॅक या योजनेत नावनोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती.परंतु, कृषी सहायकांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर या योजनेच्या  अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आता कृषी सहायकांविनाच ही योजना तलाठ्यांनी सक्षमपणे राबविण्यास सुरुवात केली असून, राज्यात आतापर्यंत ६ लाख ८८ हजार १०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ६ लाख १ हजार २०८ शेतकऱ्यांना क्रमांक मिळाला आहे.  

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५.७८% तर शेतकरी ओळख क्रमांक दिलेल्यांची संख्या ५.०५% आहे.

ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. तलाठ्यांनी त्यात पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपले ओळख क्रमांक तयार करून घ्यावेत - सरिता नरके, राज्य समन्वयक, भूमी अभिलेख विभाग, पुणे

अंमलबजावणीसाठी तलाठ्यांनी घेतला पुढाकार शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी तलाठी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांची माहिती गोळा करत आहेत, तसेच शेतकरीही स्वतःहून आपली ओळख व जमिनीची माहिती तलाठ्यांना देऊ शकतात किंवा ॲग्रिस्टॅक या संकेतस्थळावर नोंदवू शकतात.राज्यात आतापर्यंत यासाठी मेळावे घेण्यात येत असून, शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. या जोडीला भूमी अभिलेख विभागाने सामायिक सुविधा केंद्रांनाही यात सामावून घेतले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी