शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार

By श्रीकिशन काळे | Updated: October 13, 2024 17:55 IST

रसिकांना संमेलनात काही त्रास होणार नाही, याबाबत संयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार

पुणे : दिल्लीमध्ये आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी देशभरातून आणि महाराष्ट्रातून सुमारे पाच हजार रसिक येण्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. संमेलनासाठी तालकटोरा इनडोअर स्टेडिअम स्थळ निश्चित केले असून, दिल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम असणार नाही, त्या दृष्टिकोनातून या संमेलनाचे नियोजन होणार आहे.

मराठी भाषिकांसाठी दिल्ली येथे होणारे संमेलन गौरवशाली असणार आहे. दरवर्षी संमेलनामध्ये विविध परिसंवाद होत असतात. एकावेळी तीन ते चार मंडपांमध्ये कार्यक्रम होत असतात. ग्रंथप्रदर्शनासाठी स्वतंत्र मांडव टाकलेला असतो. गेल्यावर्षी अमळनेरला संमेलन झाले. तेव्हा जवळपास सर्वच मांडवांमध्ये खूप अंतर होते. त्यामुळे रसिकांना एका मांडवातून दुसरीकडे जाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. पण आता दिल्लीतील संमेलनात तसा त्रास होणार नाही. कारण दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअमच्या परिघातच संमेलनाचे सर्व मांडव उभे असणार आहेत.

दिल्लीमध्ये मराठी भाषिक लोक सुमारे पाच लाखांहून अधिक आहेत. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आहेत. या संमेलनाला येणाऱ्यांची निवास व्यवस्था महाराष्ट्र सदन, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, जैन भवन आदी ठिकाणे करण्याचे नियोजन होत आहे. त्यासाठी संयोजक सरहद संस्था प्रयत्न करत आहे. दिल्लीमध्ये अनेक मराठी सनदी अधिकारी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासह संमेलनाला एकूण पाच हजार रसिक येतील, अशी अपेक्षा आहे. नेहमीच्या संमेलनात रात्री उशिरापर्यंत रंगणारी कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमही दिल्लीत होणार नाहीत. ते सायंकाळी संपविण्याचा प्रयत्न असणार आहे. संमेलनामध्ये बहुभाषिक आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.

परिसंवादाचे विषय !

देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य, मराठी आणि महाराष्ट्र धर्म, लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता, बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन, मराठीचा अमराठी संसार, परिचर्चा-आनंदी गोपाळ या पुस्तकावर, अनुवादावर परिसंवाद, मधुरव हा विशेष कार्यक्रम असणार आहे.

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळcultureसांस्कृतिकSocialसामाजिकartकलाEducationशिक्षणdelhiदिल्ली