शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र

By नितीन चौधरी | Updated: August 21, 2023 15:33 IST

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता

पुणे: फेब्रुवारीत कांदा दरात घसरण झाल्यानंतर राज्य सरकारने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुमारे ३ लाख ३६ हजार ४७६ शेतकरी अनुदानास पात्र ठरले असून पहिल्या टप्प्यात १० कोटी व त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या २३ जिल्ह्यांना सुमारे ४६६ कोटींचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

राज्यात फेब्रुवारीत कांद्याच्या दरात घसरण झाल्याने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार, प्रति क्विंटल ३५० रुपये तसेच जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकऱ्याला अनुदान देण्याचे ठरले होते. त्यानुसार पणन संचालनालयाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. राज्यातून ४ लाख १३ हजार ८३ शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज केले होते. छानणीनंतर ३ लाख ३६ हजार ४७६ शेतकरी पात्र ठरले आहेत. तर ७६ हजार ६०७ शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरले आहेत.

२२ कोटींचे वितरण झाले

यासाठी पणन संचालनालयाने राज्य सरकारकडे ८४४ कोटी ५६ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी राज्य सरकारने ४६५ कोटी ९९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. सातारा, सांगली, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नागपूर, रायगड, यवतमाळ, अकोला, वाशिम या दहा कोटी रुपयांपेक्षा कमी अनुदान असलेल्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याशिवाय १० कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाची रक्कम असलेल्या पुणे, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, कोल्हापूर या दहा जिल्ह्यातील उत्पादकानांना ५३.९४ टक्के या प्रमाणात अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. शिल्लक निधी उपलब्ध केल्यानंतर उर्वरीत पात्र लाभार्थ्यांस वितरीत करण्यात येणार आहे. १० कोटींपेक्षा कमी असलेल्या १३ जिल्ह्यांसाठी २२ कोटी ६० लाख ५१ हजार ९७४ रुपयांची गरज होती. त्यानुसार सर्व रक्कम वितरीत करण्यात आली. तसेच १० कोटी पेक्षा जास्त अनुदान असलेल्या १० जिल्ह्यात ४४३ कोटी ३७ लाख ३३ हजार ९९४ रुपयांची गरज होती. त्यापैकी ३७८ कोटी ५८ लाख ९५ हजार ८०७ रुपयांचे वाटप केले जाणार आहे.

पुण्यात ३६ कोटींचे होणार वितरण

पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना ५४.९४ टक्के प्रमाणात निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या ६६ कोटी ८९ लाख सहा हजार ६९८ एवढा निधी आवश्यक आहे. त्यानुसार, सध्या ३६ कोटी आठ लाख १९ हजार ६४५ एवढा निधी वितरीत केला जाणार आहे. तसेच ३० कोटी ८० लाख ८७ हजार ५३ रुपयांचा निधी शिल्लक राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीSocialसामाजिकGovernmentसरकारMarketबाजार