शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील ४ पूल पाण्याखाली जाणार; मग कशाला प्रकल्प हवा? आदित्य ठाकरेंचा सवाल

By श्रीकिशन काळे | Updated: February 25, 2024 15:31 IST

पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे

पुणे : ‘‘ नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील चार पूल पाण्याखाली जाणार आहेत. मग कशाला असला नदीकाठ सुशोभीकरणाचा प्रकल्प हवा आहे? मुठा नदीमध्ये साबरमतीसारखा स्वीमिंग पूल का करायचा आहे? हा प्रकल्प तयार करताना किती पुणेकरांना विचारले गेले. स्थानिक जे लोक येथे राहत आहेत. त्यांना विचारले आहे का ? पावसाळ्यात नदी कशी वागते ? ही नदी साबरमतीसारखी आहे का ? हा सर्व विचार करणे अपेक्षित आहे. आता पुणेकरांनी निवडणूकीपूर्वी सर्व पक्षांना विचारावे की, पुण्याला वाचवणार की नाही?, असे आवाहन माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे. तरी सुद्धा पुणे मनपाने बिनदिक्कतपणे या प्रकल्पाचे काम चालूच ठेवले आहे. या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना रविवारी सकाळी पुण्यात बैठकीला बोलावले होते. या बैठकीत ‘पुणे रिव्हर रिव्हायवल’ग्रुपचे विवेक वेलणकर, सारंग यादवाडकर यांनी नदीकाठ सुधार प्रकल्पाविषयी सादरीकरण केले. या वेळी ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले,‘‘आपली शहरं भकास होत आहेत. नदीकाठ सुधार हे शहरासाठी धोकादायक आहे. आता निवडणूक येत आहे. राजकीय पक्षाला बोलावून हे सादरीकरण दाखविले पाहिजे. सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे. पुण्यात नदीकाठ सुधार झाले तर त्याचे काय नुकसान होणार आहे, ते सर्वांना सांगितले पाहिजे. आताच्या सत्ताधाऱ्यांनाही दाखवले पाहिजे. निवडणूकीत सर्वच पक्ष दारोदारी जात असतात. मतदान करा, असे सांगत असतात. त्यामुळे पुणेकरांनी हे आता निवडणूकीच्या तोंडावर बोलले पाहिजे,’’ असेही ठाकरे म्हणाले.

आयुक्त का भेटत नाहीत ?

आज स्थानिक स्वराज्य संस्था तशाच आहेत. तिथे निवडणूक झालेली नाही. आयुक्त देखील चार वर्षे झाले आहेत, बदलले नाहीत. पुण्यातही तशीच स्थिती आहे. स्थानिक नागरिकांना आयुक्त भेटत नाही. ते का भेटत नाहीत, याची मला माहिती नाही. पण त्यांनी नागरिकांना भेटायला हवे. नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी यापूर्वी रेडलाइन आणि ब्लू लाइन बदलल्या होत्या. हे धक्कादायक आहे, असे ठाकरे म्हणाले.

डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्यात मी यापूर्वी भेट दिलेली होती. तेव्हा राडारोडा होता. तो काढून टाकण्याचा आदेश दिला होता. पण आमचं सरकार गेलं आणि तिथे पुन्हा राडारोडा टाकला गेला. आता तिथली अवस्थाही वाईट आहे. पुण्याची पार वाट लावली आहे, अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरणmula muthaमुळा मुठाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाriverनदी