शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील ४ पूल पाण्याखाली जाणार; मग कशाला प्रकल्प हवा? आदित्य ठाकरेंचा सवाल

By श्रीकिशन काळे | Updated: February 25, 2024 15:31 IST

पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे

पुणे : ‘‘ नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील चार पूल पाण्याखाली जाणार आहेत. मग कशाला असला नदीकाठ सुशोभीकरणाचा प्रकल्प हवा आहे? मुठा नदीमध्ये साबरमतीसारखा स्वीमिंग पूल का करायचा आहे? हा प्रकल्प तयार करताना किती पुणेकरांना विचारले गेले. स्थानिक जे लोक येथे राहत आहेत. त्यांना विचारले आहे का ? पावसाळ्यात नदी कशी वागते ? ही नदी साबरमतीसारखी आहे का ? हा सर्व विचार करणे अपेक्षित आहे. आता पुणेकरांनी निवडणूकीपूर्वी सर्व पक्षांना विचारावे की, पुण्याला वाचवणार की नाही?, असे आवाहन माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे. तरी सुद्धा पुणे मनपाने बिनदिक्कतपणे या प्रकल्पाचे काम चालूच ठेवले आहे. या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना रविवारी सकाळी पुण्यात बैठकीला बोलावले होते. या बैठकीत ‘पुणे रिव्हर रिव्हायवल’ग्रुपचे विवेक वेलणकर, सारंग यादवाडकर यांनी नदीकाठ सुधार प्रकल्पाविषयी सादरीकरण केले. या वेळी ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले,‘‘आपली शहरं भकास होत आहेत. नदीकाठ सुधार हे शहरासाठी धोकादायक आहे. आता निवडणूक येत आहे. राजकीय पक्षाला बोलावून हे सादरीकरण दाखविले पाहिजे. सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे. पुण्यात नदीकाठ सुधार झाले तर त्याचे काय नुकसान होणार आहे, ते सर्वांना सांगितले पाहिजे. आताच्या सत्ताधाऱ्यांनाही दाखवले पाहिजे. निवडणूकीत सर्वच पक्ष दारोदारी जात असतात. मतदान करा, असे सांगत असतात. त्यामुळे पुणेकरांनी हे आता निवडणूकीच्या तोंडावर बोलले पाहिजे,’’ असेही ठाकरे म्हणाले.

आयुक्त का भेटत नाहीत ?

आज स्थानिक स्वराज्य संस्था तशाच आहेत. तिथे निवडणूक झालेली नाही. आयुक्त देखील चार वर्षे झाले आहेत, बदलले नाहीत. पुण्यातही तशीच स्थिती आहे. स्थानिक नागरिकांना आयुक्त भेटत नाही. ते का भेटत नाहीत, याची मला माहिती नाही. पण त्यांनी नागरिकांना भेटायला हवे. नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी यापूर्वी रेडलाइन आणि ब्लू लाइन बदलल्या होत्या. हे धक्कादायक आहे, असे ठाकरे म्हणाले.

डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्यात मी यापूर्वी भेट दिलेली होती. तेव्हा राडारोडा होता. तो काढून टाकण्याचा आदेश दिला होता. पण आमचं सरकार गेलं आणि तिथे पुन्हा राडारोडा टाकला गेला. आता तिथली अवस्थाही वाईट आहे. पुण्याची पार वाट लावली आहे, अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरणmula muthaमुळा मुठाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाriverनदी