शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील ४ पूल पाण्याखाली जाणार; मग कशाला प्रकल्प हवा? आदित्य ठाकरेंचा सवाल

By श्रीकिशन काळे | Updated: February 25, 2024 15:31 IST

पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे

पुणे : ‘‘ नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील चार पूल पाण्याखाली जाणार आहेत. मग कशाला असला नदीकाठ सुशोभीकरणाचा प्रकल्प हवा आहे? मुठा नदीमध्ये साबरमतीसारखा स्वीमिंग पूल का करायचा आहे? हा प्रकल्प तयार करताना किती पुणेकरांना विचारले गेले. स्थानिक जे लोक येथे राहत आहेत. त्यांना विचारले आहे का ? पावसाळ्यात नदी कशी वागते ? ही नदी साबरमतीसारखी आहे का ? हा सर्व विचार करणे अपेक्षित आहे. आता पुणेकरांनी निवडणूकीपूर्वी सर्व पक्षांना विचारावे की, पुण्याला वाचवणार की नाही?, असे आवाहन माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे. तरी सुद्धा पुणे मनपाने बिनदिक्कतपणे या प्रकल्पाचे काम चालूच ठेवले आहे. या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना रविवारी सकाळी पुण्यात बैठकीला बोलावले होते. या बैठकीत ‘पुणे रिव्हर रिव्हायवल’ग्रुपचे विवेक वेलणकर, सारंग यादवाडकर यांनी नदीकाठ सुधार प्रकल्पाविषयी सादरीकरण केले. या वेळी ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले,‘‘आपली शहरं भकास होत आहेत. नदीकाठ सुधार हे शहरासाठी धोकादायक आहे. आता निवडणूक येत आहे. राजकीय पक्षाला बोलावून हे सादरीकरण दाखविले पाहिजे. सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे. पुण्यात नदीकाठ सुधार झाले तर त्याचे काय नुकसान होणार आहे, ते सर्वांना सांगितले पाहिजे. आताच्या सत्ताधाऱ्यांनाही दाखवले पाहिजे. निवडणूकीत सर्वच पक्ष दारोदारी जात असतात. मतदान करा, असे सांगत असतात. त्यामुळे पुणेकरांनी हे आता निवडणूकीच्या तोंडावर बोलले पाहिजे,’’ असेही ठाकरे म्हणाले.

आयुक्त का भेटत नाहीत ?

आज स्थानिक स्वराज्य संस्था तशाच आहेत. तिथे निवडणूक झालेली नाही. आयुक्त देखील चार वर्षे झाले आहेत, बदलले नाहीत. पुण्यातही तशीच स्थिती आहे. स्थानिक नागरिकांना आयुक्त भेटत नाही. ते का भेटत नाहीत, याची मला माहिती नाही. पण त्यांनी नागरिकांना भेटायला हवे. नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी यापूर्वी रेडलाइन आणि ब्लू लाइन बदलल्या होत्या. हे धक्कादायक आहे, असे ठाकरे म्हणाले.

डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्यात मी यापूर्वी भेट दिलेली होती. तेव्हा राडारोडा होता. तो काढून टाकण्याचा आदेश दिला होता. पण आमचं सरकार गेलं आणि तिथे पुन्हा राडारोडा टाकला गेला. आता तिथली अवस्थाही वाईट आहे. पुण्याची पार वाट लावली आहे, अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरणmula muthaमुळा मुठाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाriverनदी