शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी ३३.७१ कोटींचा निधी            

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 7:15 PM

राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे विभागाला ३३.७१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे निधी आभावी काही काळ प्रलंबित असणा-या कामांना गती मिळणार आहे.

पुणे: राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे विभागाला ३३.७१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे निधी आभावी काही काळ प्रलंबित असणा-या कामांना गती मिळणार आहे.

राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये पुणे विभागातील कोल्हापूर,सातारा,सांगली,सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातील ६०२ गावात ११ हजार ६९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यातील ८ हजार ४४६ कामे पूर्ण झाली असून १ हजार ८२५ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २१३ गावांमध्ये ३ हजार ८८१ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यातील २ हजार ७६५ कामे पूर्ण झाली आहेत.तर जिल्ह्यातील १ हजार ४ कामे प्रगतीपथावर आहेत. शासनाकडून पुणे जिल्ह्यातील कामांसाठी ११.९२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, खोल सलग समपातळी चर ,शेततळे व वनतळे, अनघड दगडाचे बांध, माती नाला बांध व दुरूस्ती, सिमेंट बंधारा, पाझर तलाव दुरूस्ती, नाला खोलीकरण व रुंदीकरंण, विहिर बोअर पुनर्भरण, तलावातील व धरणातील गाळ काढणे आदी कामे केली जात आहेत. त्यामुळे भूपृष्टावरील व भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे.

पुणे विभागात केल्या जाणा-या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे २६ हजार ८१४ टीसीएम पाणीसाठा निर्माण निर्माण होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार २८८ टीसीएम, सोलापूर जिल्ह्यात ८ हजार १४१ टीसीएम, सांगली जिल्ह्यात 6 हजार ७८३ टीसीएम, साता-यात २ हजार १२६ आणि कोल्हापूरमध्ये १ हजार ४७७ टीसीएम पाणीसाठा वाढणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारFarmerशेतकरी