शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महापुरुषांची २७ पुस्तकांत बदनामी; शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:01 AM

पुणे : राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत एकूण ४६४ पुस्तके असून राज्यात १ लाख २१ हजार प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येकी ...

पुणे : राज्य सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत एकूण ४६४ पुस्तके असून राज्यात १ लाख २१ हजार प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येकी २०० पुस्तके वाटण्यात आली आहेत. त्यातील २७ पुस्तकांमध्ये बहुजन महापुरुषांची बदनामी करण्यात आली असून, ही पुस्तके तत्काळ मागे घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.

दोषी असणाऱ्या सर्व अधिकाºयांचे निलंबन करावे व लेखक, प्रकाशक, वितरक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, अर्थक्रांतीचे राज्य समन्वयक प्रभाकर कोंढाळकर आदी उपस्थित होते. या सर्व वादग्रस्त पुस्तकांचे लेखक हे आरएसएसशी संबंधित असून त्यांनी खोटा इतिहास पसरविण्याचे षड्यंत्र आखल्याचा आरोप करण्यात आला.

संतोष शिंदे म्हणाले, ‘‘डॉ. शुभा साठेलिखित ‘समर्थ रामदास स्वामी’ पुस्तकात छत्रपती संभाजीमहाराज यांचा ‘दारूड्या’ असा उल्लेख करून ‘राजा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता,’ अशी बदनामी करण्यात आली आहे. तर, गोपीनाथ तळवलकरलिखित ‘संताचे जीवन प्रसंग’ पुस्तकात तुकाराम महाराजांना ‘हे आमचं येडं’ असे त्यांच्या पत्नीच्या तोंडातून वदवून घेण्यात आले आहे. प्र. ग. सहस्रबुद्धेलिखित ‘छत्रपती राजा शिवाजी’ यात शिवरायांचे रामदासीकरण करण्यात आलेले आहे. तर, डॉ. प्रभाकर चौधरीलिखित ‘सद्गुणांच्या गोष्टी’ या पुस्तकात रामदास शिवरायांना म्हणतात, ‘सारं राज्य मला देऊन टाकल्यावर तुम्ही काय करणार...?’ शिवाजी महाराज म्हणाले, ‘मी तुमच्यासोबत येईन, भिक्षा मागेन’ आणि ‘राजांनी डोक्याचा पटका सोडून त्याची झोळी केली,’ असा उल्लेख आहे.’’

 

सिंहगड सोसायटीने शिष्यवृत्तीचा केला अपहारसिंहगड एज्युकेशन सोसायटीकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची १ हजार ७७९ विद्यार्थ्यांची ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता अपहार केला असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, याप्रकरणी सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज चतु:शृंगी पोलीस ठाण्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या १६ आॅक्टोबर रोजी कार्यकर्ते व विद्यार्थी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतील.

सदानंद मोरे यांची समितीवर नेमणूक नकोमहापुरुषांची बदनामी केलेल्या पुस्तकांच्या चौकशी समितीवर सदानंद मोरे आणि पांडुरंग बलकवडे यांना नेमण्यात येऊ नये. मोरे हे सरकारची तळी उचलण्याचे काम करतात. त्याऐवजी खरा इतिहास लिहिणाºया लेखकांची या समितीवर नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड