शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 20:40 IST

महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे

वडगाव कांदळी : जाधववाडी (ता. जुन्नर) येथील देवमळा परिसरातील २० ते २५ एकर ऊस बुधवार (दि.२) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने जाळून खाक झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील पाडुरंग जाधव यांच्या शेतातून विजेचा खांब गेला आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पणे शाॅर्टसर्कीट होऊन ठिणगी पडल्याने आग लागली. त्यामुळे आजुबाजुला असलेल्या शेतातील उसाने पेट घेऊन मोठे नुकसान झाले असल्याचे बबन जाधव यांनी सांगितले.

यामध्ये बबन जाधव, पांडुरंग जाधव, आत्माराम जाधव, ज्ञानदेव जाधव , शरद बांगर, लक्ष्मण जाधव, राजेंद्र जाधव, अरूणा जाधव, दत्तु जाधव या शेतक-यांचा जवळपास २० ते २५ एकर ऊस जळाला असुन त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी विद्युत विभागाचे अधिकारी तसेच साखर कारखान्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली.

टॅग्स :Junnarजुन्नरFarmerशेतकरीfireआगSugar factoryसाखर कारखाने