शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जिल्ह्यातील २४ हजार शेतकरी ‘आधार’ पासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 22:30 IST

आधी बँक खाते आधार लिंक करा; नंतरच कर्ज माफीसाठी पात्र ठरला..

ठळक मुद्देआधार लिंकसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना पत्रसर्व शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक

पुणे : राज्य शासनाच्या शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील अद्यापही तब्बल २४ हजार पेक्षा अधिक शेतकचे बँक खाते आधार लिंक नसल्याचे समोर आले आहे. या सर्व शेतक-यांना आधी बँक खाते आधार लिंक करा , त्यानंतरच शेतक-यांना कर्ज माफीसाठीचा अर्ज भरता येणार आहे. यामुळे शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची बँक खाती आधार लिंक करण्यासाठी  सहकार्य करण्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित बँकांना दिले आहे.     राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाशिव आघाडी सरकारने शेतक-यांसाठी ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना’ जाहिर केली आहे. शासनाने शेतक-यांना कर्ज माफी जाहिर करताना अनेक अटी घातल्या आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाची अट कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना आपले बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला केवळ २ लाख रुपयापर्यंत कर्ज माफी देण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ९२ हजार १३४ शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे कर्जमाफी देण्यासाठी १ हजार ८४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु यासाठी सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे. शेतक-यांचे बँक खाती आधार लिंक करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि बँक प्रतिनिधीची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकांनी  खास शिबिरांचे आयोजन करुन लवकरात लवकर शिल्लक राहिलेल्या शेतक-यांची बँक खाते आधार लिंक करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीAdhar Cardआधार कार्डState Governmentराज्य सरकार