शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २४ हजार शेतकरी ‘आधार’ पासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 22:30 IST

आधी बँक खाते आधार लिंक करा; नंतरच कर्ज माफीसाठी पात्र ठरला..

ठळक मुद्देआधार लिंकसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना पत्रसर्व शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक

पुणे : राज्य शासनाच्या शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील अद्यापही तब्बल २४ हजार पेक्षा अधिक शेतकचे बँक खाते आधार लिंक नसल्याचे समोर आले आहे. या सर्व शेतक-यांना आधी बँक खाते आधार लिंक करा , त्यानंतरच शेतक-यांना कर्ज माफीसाठीचा अर्ज भरता येणार आहे. यामुळे शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची बँक खाती आधार लिंक करण्यासाठी  सहकार्य करण्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित बँकांना दिले आहे.     राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाशिव आघाडी सरकारने शेतक-यांसाठी ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना’ जाहिर केली आहे. शासनाने शेतक-यांना कर्ज माफी जाहिर करताना अनेक अटी घातल्या आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाची अट कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना आपले बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला केवळ २ लाख रुपयापर्यंत कर्ज माफी देण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ९२ हजार १३४ शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे कर्जमाफी देण्यासाठी १ हजार ८४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु यासाठी सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे. शेतक-यांचे बँक खाती आधार लिंक करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि बँक प्रतिनिधीची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकांनी  खास शिबिरांचे आयोजन करुन लवकरात लवकर शिल्लक राहिलेल्या शेतक-यांची बँक खाते आधार लिंक करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीAdhar Cardआधार कार्डState Governmentराज्य सरकार