शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २०० गावे झाली पाणीदार -यशवंत शितोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:56 IST

जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील २०० गावांमधील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे. या कामामुळे जवळपास ०.४२ टीएमसी पाणी साठणार आहे. सन २०१४-१५ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजनेची ग्रामपातळीवरून राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३५५ कामे, तर दुस-या टप्प्यात ४८० कामे करण्यात आली.

जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील २०० गावांमधील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे. या कामामुळे जवळपास ०.४२ टीएमसी पाणी साठणार आहे. सन २०१४-१५ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजनेची ग्रामपातळीवरून राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३५५ कामे, तर दुस-या टप्प्यात ४८० कामे करण्यात आली. आता शेतक-यांनी छोटे पाटबंधारे विभागामार्फत केल्या जाणा-या जलसंधारणाच्या कामाचा योग्य पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी केले आहे.यशवंत शितोळे म्हणाले, की सन २०१५-१६ या वर्षासाठी पहिल्या टप्प्यात २०० गावांची निवड करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३५५ कामे हाती घेण्यात आली होती. यापैकी १९५ कामांसाठी शासनाच्या विशेष निधीतून २४.१३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, तर जिल्हा नियोजन समिती मार्फत मिळालेल्या १३.३६ कोटी आणि जिल्हा परिषदेने १७७ कामांसाठी २१.५१ कोटींचा निधी खर्च करून ही कामे पूर्ण केली. या कामांमध्ये वळण बंधारे, साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या नवीन कामांचा आणि दुरुस्तीचा समावेश करण्यात आला होता.जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून या प्रकारची आणखी १५५ कामे पूर्ण केली असून, त्यासाठी १२.९० कोटींचा निधी खर्च केला आहे. अशा प्रकारे २०० गावांमध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत ३४.४३ कोटी खर्च करून ३३२ कामे पूणे केली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मिळून सुमारे ११८८४ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा (०.४२ टीएमसी/अब्ज घनफूट) निर्माण झाला आहे.या पाणीसाठ्यामुळे १९८२ हेक्टरवर सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना याचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे.सन २०१६-१७ या वर्षामध्ये आराखड्यानुसार १९० गावांमध्ये ४८० कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आली होती.नाला खोलीकरण आणि गाळ काढण्याची सुमारे १३० कामे लोकसहभागातून करणे अपेक्षित होते. निधीच्या उपलब्धतेनुसार १६६ कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ८८ नवीन आणि २८ दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेस ५.६६ कोटी रुपये उपलब्ध झाले असून, त्यामध्ये ४२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.जलयुक्त शिवार योजनेबरोबरच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या जमिनींवर गाळ अस्तरीकरण केले आहे. १३३ पाझर तलावामधून गाळ काढला असून, सुमारे १६६.८० हेक्टरवर गाळ पसरविण्यात आला आहे.शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, बारामती तालुक्यांमधील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन गाळयुक्त शिवाराला प्राधान्य दिले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांत गाळ अस्तरीकरणाद्वारे जिल्ह्यातील शेतकºयांना फायदा झाला आहे.लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या आर्थिक मदतीद्वारे पाझर तलावातील गाळ काढून शेतकºयांच्या जमिनीवर पसरविण्यात येत आहे. त्यामुळे पाझर रुंदीकरण व शेतकºयांच्या जमिनीचा पोत वाढण्यास मदत होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाझर तलावांची साठवणक्षमता वाढण्यासाठी आणि शेतकºयांच्या जमिनींवर गाळाचे अस्तरीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेद्वारे शासनाच्या वतीने पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकºयांना परवानगी देण्यात आली आहे.पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर पाझर तलावात साचल्यास त्याचा शेतकºयांना फायदा होत आहे. तसेच उत्पदनातही वाढ होणार आहे. पाझर तलावातील गाळ काढून तलावांची पाणीक्षमता वाढविणे आणि शेतकºयांच्या जमिनींवर गाळ पसरल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होणे अशा दुहेरी फायद्यामुळे योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे यशवंत शितोळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी