शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

खेड तालुका : ‘आयुष्मान भारत’चा १६ हजार कुटुंबांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 02:40 IST

एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या खेड तालुक्यातील १५ हजार ९१५ कुटुंबांना ‘आयुष्यमान भारत’ या केंद्रच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबाला ५ लाख रुपये विमा संरक्षण मिळणार असून, एकूण ९७२ आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात या कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहेत.

राजगुरुनगर - एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या खेड तालुक्यातील १५ हजार ९१५ कुटुंबांना ‘आयुष्यमान भारत’ या केंद्रच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबाला ५ लाख रुपये विमा संरक्षण मिळणार असून, एकूण ९७२ आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात या कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहेत. १०९७ या टोल फ्री क्रमांकावर याबाबत सविस्तर माहिती मिळू शकते. ही योजना सर्वसामान्य नागरिकांना फायद्याची ठरणार असून, या योजनेचा लाभ देण्यासाठी गावपातळीवरील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, आरोग्य सहायक, आरोग्यसेवक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षित केले जाणार असून, त्याद्वारे गावातील कुटुंबाला मदत दिली जाणार आहे.या योजनेत समाविष्ट असणाऱ्या दवाखान्यांची संख्या वाढविण्यावर भर देणार असून, राजगुरुनगर शहरातून २९७ व चाकणमधून ७४९ कुटुंबांना याचा लाभ होणार असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी दिली.पात्र कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाची माहिती संकलित करून ती आॅनलाइन पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या कुटुंबाने दिलेल्या मोबाईल क्रमांक पुढील काळात बदलता येणार नाही. कारण लाभ देताना मोबाईलवर ओटीपी क्रमांक येणार असल्याने आता मोबाईल क्रमांक बदलण्याचे शासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.ही एक प्रकारची पॉलिसी आहे. तिचा अधिकचा हिस्सा सरकार देणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वर्षाला ११०० ते १२०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. विमा मात्र संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे. ही केंद्र सरकारची योजना असून ती तत्काळ सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकार ५० टक्के रक्कम देणार आहे.केंद्र सरकारने यासाठी ५ ते ६ हजार कोटी निधी उपलब्ध केला आहे. देशातील दीड लाख सर्व सुविधा असलेली हॉस्पिटल समाविष्ट करण्यात आली असून, कॉशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सर्वेक्षणानुसार बनविली योजनासन २०११ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार कुटुंबाची माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. त्याअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी कुटुंबातील नागरिकांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. हे आधार कार्ड सरकारी योजनेच्या साईटवरून लिंक करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला आधार आयडी देण्यात येणार आहे. आधार कार्ड आणि ओळखपत्र लिंक केले जाणार आहे. याबरोबरच संबंधित व्यक्तीचे बँकेत खाते असणे महत्त्वाचे आहे.बँक खाते आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त रेशनकार्ड, मतदान कार्ड, जन्माचा दाखला, शाळेचा दाखला जमा करणे गरजेचे आहे. या योजनेद्वारे गरीब आणि गरजवंत कुटुंबातील आजारी व्यक्तीला अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तालुक्यात ती प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. खेड तालुक्यातून या योजनेसाठी १९१ महसुली गावांतून १५ हजार ९१५ लाभार्थी निवडण्यात आले आहेत. त्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी गावपातळीवर ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती आरोग्यसहायक, आरोग्यसेवक यांच्या माध्यमातून माहिती देऊन आवश्यक कागदपत्रे जमा करून आॅनलाइन नोंदणी केली जाणार आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतGovernmentसरकारPuneपुणे