शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

जिल्ह्यातील १३ हजार जणांना हलविले सुरक्षित स्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:55 IST

शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहरात अधिक बाधित : पूराचे पाणी ओसरल्यावर करणार पंचनामे

पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे मुठा आणि मुळा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.  स्थलांतरीतांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर संबंधितांच्या घरांचे पंचानामे करुन त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी सांगितले. जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पिपंरी-चिंचवड आणि पुणे शहरातील नदीलगतच्या झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमधे पाणीशिरले होते. त्यामुळे येथील नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले. जिल्ह्यातील ३,३४३ कुटुंबातील १३,३३६ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यातील बारामती तालुक्यातील ५० आणि दौंड मधील१०० कुटुंबे आहेत. सर्वाधिक बाधित पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील आहेत. या स्थलांतरीतांना जवळच्या शाळा आणि समाज मंदिरामधे हलविण्यात आले आहे. वाकडच्या सूर्या हॉस्पिटलमधील ५० रुग्ण आणि १२० कर्मचाऱ्यांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हवामान विभागाने रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तर, पुढील दोन दिवस जोरदार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर तुलनेने कमी झाला आहे. अशीच स्थिती राहिल्यास पाण्याचा विसर्ग आटोक्यात राहील. त्यामुळे तूर्तास या पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाही, असे राव यांनी दिली. ---------------------बंडगार्डन येथे १ लाख ८० हजार क्युसेकची धोक्याची पातळी आहे. सध्याची स्थिती पाहता १ लाख ४० हजार क्युसेकपेक्षा अधिकपाण्याचा विसर्ग होणार नाही. पाणीपातळी ही धोक्याच्या खालीच राहील. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. नवल किशोर राम, जिल्हाधिकारी--------------------चार तालुके अजूनही रितेचवेल्हे, मावळ, मुळशी या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस होत असला तरी जिल्ह्यातील इंदापूर (३१ टक्के), दौंड (४०टक्के), बारामती (५८टक्के) आणि  शिरुर (५९टक्के) तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मावळला सरासरीच्या दोनशे टक्के, मुळशी १३४, भोर १४१, जुन्नर १४७ आणि खेडला १३९ टक्के पाऊस झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूर