शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १३ हजार जणांना हलविले सुरक्षित स्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:55 IST

शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहरात अधिक बाधित : पूराचे पाणी ओसरल्यावर करणार पंचनामे

पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे मुठा आणि मुळा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.  स्थलांतरीतांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर संबंधितांच्या घरांचे पंचानामे करुन त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी सांगितले. जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पिपंरी-चिंचवड आणि पुणे शहरातील नदीलगतच्या झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमधे पाणीशिरले होते. त्यामुळे येथील नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले. जिल्ह्यातील ३,३४३ कुटुंबातील १३,३३६ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यातील बारामती तालुक्यातील ५० आणि दौंड मधील१०० कुटुंबे आहेत. सर्वाधिक बाधित पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील आहेत. या स्थलांतरीतांना जवळच्या शाळा आणि समाज मंदिरामधे हलविण्यात आले आहे. वाकडच्या सूर्या हॉस्पिटलमधील ५० रुग्ण आणि १२० कर्मचाऱ्यांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हवामान विभागाने रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तर, पुढील दोन दिवस जोरदार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर तुलनेने कमी झाला आहे. अशीच स्थिती राहिल्यास पाण्याचा विसर्ग आटोक्यात राहील. त्यामुळे तूर्तास या पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाही, असे राव यांनी दिली. ---------------------बंडगार्डन येथे १ लाख ८० हजार क्युसेकची धोक्याची पातळी आहे. सध्याची स्थिती पाहता १ लाख ४० हजार क्युसेकपेक्षा अधिकपाण्याचा विसर्ग होणार नाही. पाणीपातळी ही धोक्याच्या खालीच राहील. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. नवल किशोर राम, जिल्हाधिकारी--------------------चार तालुके अजूनही रितेचवेल्हे, मावळ, मुळशी या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस होत असला तरी जिल्ह्यातील इंदापूर (३१ टक्के), दौंड (४०टक्के), बारामती (५८टक्के) आणि  शिरुर (५९टक्के) तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मावळला सरासरीच्या दोनशे टक्के, मुळशी १३४, भोर १४१, जुन्नर १४७ आणि खेडला १३९ टक्के पाऊस झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूर