शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यातील १३ हजार जणांना हलविले सुरक्षित स्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:55 IST

शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहरात अधिक बाधित : पूराचे पाणी ओसरल्यावर करणार पंचनामे

पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे मुठा आणि मुळा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.  स्थलांतरीतांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर संबंधितांच्या घरांचे पंचानामे करुन त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी सांगितले. जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पिपंरी-चिंचवड आणि पुणे शहरातील नदीलगतच्या झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमधे पाणीशिरले होते. त्यामुळे येथील नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले. जिल्ह्यातील ३,३४३ कुटुंबातील १३,३३६ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यातील बारामती तालुक्यातील ५० आणि दौंड मधील१०० कुटुंबे आहेत. सर्वाधिक बाधित पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील आहेत. या स्थलांतरीतांना जवळच्या शाळा आणि समाज मंदिरामधे हलविण्यात आले आहे. वाकडच्या सूर्या हॉस्पिटलमधील ५० रुग्ण आणि १२० कर्मचाऱ्यांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हवामान विभागाने रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तर, पुढील दोन दिवस जोरदार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर तुलनेने कमी झाला आहे. अशीच स्थिती राहिल्यास पाण्याचा विसर्ग आटोक्यात राहील. त्यामुळे तूर्तास या पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाही, असे राव यांनी दिली. ---------------------बंडगार्डन येथे १ लाख ८० हजार क्युसेकची धोक्याची पातळी आहे. सध्याची स्थिती पाहता १ लाख ४० हजार क्युसेकपेक्षा अधिकपाण्याचा विसर्ग होणार नाही. पाणीपातळी ही धोक्याच्या खालीच राहील. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. नवल किशोर राम, जिल्हाधिकारी--------------------चार तालुके अजूनही रितेचवेल्हे, मावळ, मुळशी या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस होत असला तरी जिल्ह्यातील इंदापूर (३१ टक्के), दौंड (४०टक्के), बारामती (५८टक्के) आणि  शिरुर (५९टक्के) तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मावळला सरासरीच्या दोनशे टक्के, मुळशी १३४, भोर १४१, जुन्नर १४७ आणि खेडला १३९ टक्के पाऊस झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूर