शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

महाराष्ट्रात तयार होणार १२० वंदे भारत ट्रेनचे कोच; राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:40 IST

४०० पैकी १२० वंदे भारत ट्रेनचे डब्बे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बनविण्याचे काम लवकरच सुरू होणार...

पुणे : देशात ४०० वंदे भारत ट्रेन टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, या ट्रेनसाठी लागणारे कोचेस महाराष्ट्रात बनवणार आहेत. ४०० पैकी १२० वंदे भारत ट्रेनचे डब्बे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बनविण्याचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यामुळे मराठवाड्याच्या विकासात भर पडणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या न्यू आष्टी-अहमदनगर या ६६ किमी रेल्वे लाइनचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी न्यू आष्टी रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सुरेश धस, राम शिंदे, बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि नगराध्यक्षा पल्लवी धोंडे उपस्थित होते.

यावेळी दानवे म्हणाले, मराठवाडा विदर्भ हा मागासभाग आहे, येथे दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही. पण या भागाला निधी देण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे. नगर - परळी या रेल्वे लाइनचे स्वप्न मुंडेसाहेबांनी पाहिले होते. ते आता प्रत्यक्षात येत आहे. नगर - परळी - बीड मार्ग पूर्ण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मुंडेसाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ९६ टक्के जमिनीचे भूसंपादन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. येत्या मार्च २०२३ पर्यंत हा मार्ग आम्ही पूर्ण करणार आहोत, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करणे हीच खरी मुंडेसाहेबांना आदरांजली असेल. या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाली.

टॅग्स :Puneपुणेraosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे