शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महाराष्ट्रात तयार होणार १२० वंदे भारत ट्रेनचे कोच; राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:40 IST

४०० पैकी १२० वंदे भारत ट्रेनचे डब्बे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बनविण्याचे काम लवकरच सुरू होणार...

पुणे : देशात ४०० वंदे भारत ट्रेन टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, या ट्रेनसाठी लागणारे कोचेस महाराष्ट्रात बनवणार आहेत. ४०० पैकी १२० वंदे भारत ट्रेनचे डब्बे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बनविण्याचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यामुळे मराठवाड्याच्या विकासात भर पडणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या न्यू आष्टी-अहमदनगर या ६६ किमी रेल्वे लाइनचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी न्यू आष्टी रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सुरेश धस, राम शिंदे, बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि नगराध्यक्षा पल्लवी धोंडे उपस्थित होते.

यावेळी दानवे म्हणाले, मराठवाडा विदर्भ हा मागासभाग आहे, येथे दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही. पण या भागाला निधी देण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे. नगर - परळी या रेल्वे लाइनचे स्वप्न मुंडेसाहेबांनी पाहिले होते. ते आता प्रत्यक्षात येत आहे. नगर - परळी - बीड मार्ग पूर्ण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मुंडेसाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ९६ टक्के जमिनीचे भूसंपादन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. येत्या मार्च २०२३ पर्यंत हा मार्ग आम्ही पूर्ण करणार आहोत, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करणे हीच खरी मुंडेसाहेबांना आदरांजली असेल. या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाली.

टॅग्स :Puneपुणेraosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे