शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

सरासरीच्या १११ टक्के पाऊस; इंदापूर, दौैंड, शिरूर कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:24 IST

जिल्ह्यात १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर तालुक्याने मात्र अद्याप पावसाळा अनुभवला नाही.

पुणे : जिल्ह्यात १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर,दौैंड व शिरूर तालुक्याने मात्र अद्याप पावसाळा अनुभवला नाही. तेथे पावसाने चांगलीच ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. चारा, पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या वर्षी पावसाने दमदार आगमन केले. पहिल्या इनिंगमध्येच पावसाने जूनची सरासरी ओलांडली. विशेष म्हणजे नेहमी आवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यात सुरुवातीलाच आगमन केल्याने यावर्षी तेथील परिस्थिती बदलेल अशी आशा लागली होती. मात्र नंतर पावसाने ओढ दिली.जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांत सरासरी ४५0 मिलिमीटर इतका पाऊस होतो. आतापर्यंत ५0१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. टक्केवारीत तो १११ टक्के इतका आहे.जून ते आॅक्टोबर महिन्यात ८२३.६ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होतो. आतापर्यंत या सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक मावळ तालुक्यात १६0९ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत २२२ टक्के इतका आहे. तर त्या खालोखाल मुळशी तालुक्यात १४६२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १५0 टक्के पाऊस झाला आहे. भोर १७६ टक्के, जुन्नर १३१ टक्के, खेड १२0 तर पुरंदर १0१ टक्के पाऊस झाला आहे.>दमदार पावसाची आजही गरज...जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ९९ टक्के पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. खरिपाचे क्षेत्र २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर (उसाशिवाय) क्षेत्र असून, या पैकी २ लाख ३० हजार ४५२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, ३४२ टक्के एवढ्या क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसात खंड पडला आहे. त्यामुळे दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.>इंदापूर, दौैंड व शिरूरला ओढजिल्ह्यातील नेहमीच आवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यांतील बारामती वगळता इंदापूर, दौैंड व शिरूरला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. बारामतीत ९६ टक्के पाऊस झाला असून, इंदापूरला ८६, दौैंडला ६४ तर शिरूरला ५४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे दुष्काळसदृृश परिस्थिती निर्माण होत आहे. विहिरींचा पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांना चार व पाणीटंचाई निर्माण होत आहे.>इंदापूरला ओढे, नाले कोरडे ठणठणीतइंदापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरविली असल्याने दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत आहे. ओढे, नाले वाहून गेले नसल्याने अर्धा पावसाळा संपत आला, तरीही कोरडे ठणठणीत दिसत आहेत. पाणी नसल्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. जनावरांना चारा पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.>चासकमानच्या आवर्तनामुळे पाणीटंचाईची अटोक्यातपावसाळा सुरू होऊन अडिच महिने उलटले तरी तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. आतापर्यंत केवळ ५४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे, अशी परिस्थीती असून देखिल तालुक्यात टंचाईसदृश चित्र नाही. ग्रामपंच्याययतींकडून अद्याप पाणीटंचाईविषयी काही अहवाल पंचायत समितीकडे प्राप्त झालेले नाही. चासकमानच्या आवर्तनामुळे पाणीटंचाईची परिस्थीती आटोक्यात राहिली असे तहसिलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळ