शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

सरासरीच्या १११ टक्के पाऊस; इंदापूर, दौैंड, शिरूर कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:24 IST

जिल्ह्यात १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर तालुक्याने मात्र अद्याप पावसाळा अनुभवला नाही.

पुणे : जिल्ह्यात १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर,दौैंड व शिरूर तालुक्याने मात्र अद्याप पावसाळा अनुभवला नाही. तेथे पावसाने चांगलीच ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. चारा, पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या वर्षी पावसाने दमदार आगमन केले. पहिल्या इनिंगमध्येच पावसाने जूनची सरासरी ओलांडली. विशेष म्हणजे नेहमी आवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यात सुरुवातीलाच आगमन केल्याने यावर्षी तेथील परिस्थिती बदलेल अशी आशा लागली होती. मात्र नंतर पावसाने ओढ दिली.जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांत सरासरी ४५0 मिलिमीटर इतका पाऊस होतो. आतापर्यंत ५0१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. टक्केवारीत तो १११ टक्के इतका आहे.जून ते आॅक्टोबर महिन्यात ८२३.६ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होतो. आतापर्यंत या सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक मावळ तालुक्यात १६0९ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत २२२ टक्के इतका आहे. तर त्या खालोखाल मुळशी तालुक्यात १४६२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १५0 टक्के पाऊस झाला आहे. भोर १७६ टक्के, जुन्नर १३१ टक्के, खेड १२0 तर पुरंदर १0१ टक्के पाऊस झाला आहे.>दमदार पावसाची आजही गरज...जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ९९ टक्के पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. खरिपाचे क्षेत्र २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर (उसाशिवाय) क्षेत्र असून, या पैकी २ लाख ३० हजार ४५२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, ३४२ टक्के एवढ्या क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसात खंड पडला आहे. त्यामुळे दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.>इंदापूर, दौैंड व शिरूरला ओढजिल्ह्यातील नेहमीच आवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यांतील बारामती वगळता इंदापूर, दौैंड व शिरूरला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. बारामतीत ९६ टक्के पाऊस झाला असून, इंदापूरला ८६, दौैंडला ६४ तर शिरूरला ५४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे दुष्काळसदृृश परिस्थिती निर्माण होत आहे. विहिरींचा पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांना चार व पाणीटंचाई निर्माण होत आहे.>इंदापूरला ओढे, नाले कोरडे ठणठणीतइंदापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरविली असल्याने दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत आहे. ओढे, नाले वाहून गेले नसल्याने अर्धा पावसाळा संपत आला, तरीही कोरडे ठणठणीत दिसत आहेत. पाणी नसल्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. जनावरांना चारा पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.>चासकमानच्या आवर्तनामुळे पाणीटंचाईची अटोक्यातपावसाळा सुरू होऊन अडिच महिने उलटले तरी तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. आतापर्यंत केवळ ५४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे, अशी परिस्थीती असून देखिल तालुक्यात टंचाईसदृश चित्र नाही. ग्रामपंच्याययतींकडून अद्याप पाणीटंचाईविषयी काही अहवाल पंचायत समितीकडे प्राप्त झालेले नाही. चासकमानच्या आवर्तनामुळे पाणीटंचाईची परिस्थीती आटोक्यात राहिली असे तहसिलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळ