शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

१०५ वर्षांचे डॉ बळवंत घाटपांडे यांचे निधन, बघा अखेरची दुर्मिळ मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 15:25 IST

१०५ वर्षांचे आणि अखेरच्या दिवसापर्यंत कार्यरत असणाऱ्या डॉ बळवंत पंढरीनाथ घाटपांडे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या सूत्रीच्या आधारावर ते शेवटपर्यंत निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगत होते.

पुणे :१०५ वर्षांचे आणि अखेरच्या दिवसापर्यंत कार्यरत असणाऱ्या डॉ बळवंत पंढरीनाथ घाटपांडे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या सूत्रीच्या आधारावर ते शेवटपर्यंत निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगत होते. शतकाचा बदल अनुभलेले डॉ घाटपांडे शेवटच्या दिवसापर्यंत दवाखान्यात नियमित येऊन रुग्णांची तपासणी करत. कोणच्याही मदतीशिवाय चालणारी त्यांची ही दिनचर्या विशेष होती. 

घाटपांडे यांचा जन्म जुन्नरजवळील आळे गावातला. लहानपणी डॉक्टर बनण्याचा निश्चय केल्यावर त्यांनी तो प्रचंड चिकाटीने अमलात आणला. त्यात तीनवेळा अपयश आल्यावरही त्यांनी ऍडमिशन मिळवली आणि मागील ८२ वर्षे त्यांचीरुग्णसेवा अविरतपणे केली. नव्या काळातले तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत जुन्याचा ऋणानुबंधही त्यांनी तोडला नाही . काहीही झालं तरी रोज अर्धा तास व्यायाम, सूर्यनमस्कार, कवायत करण्यास ते विसरले नाहीत. त्याशिवाय साधे, सात्विक जेवण घेताना अर्धा लिटर दुधही ते प्यायचे. घाटपांडे यांना तीन मुले असून तिघेही वैद्यकीय क्षेत्रातच आहेत. घाटपांडे यांची पदवीही वेगळी असून ती एल. सी. पी. एस. अशी होती. याचे पूर्ण रूप लायसन्स इन मेडिकल प्रॅक्टिस अँड सर्जरी असल्याचे ते सांगायचे. 

त्यापूर्वी काही महिने लोकमतने त्यांच्याशी बातचीत केली होती. तेव्हाच्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, ' ''गेल्या १००वर्षात समाज घडलाही आणि बिघडालाही. आता आजार वाढले तशा डॉक्टरांच्या शुल्कातही वाढ झाली आहे. मात्र रुग्णांना बर करायला नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे जगणं सोपं झालं आहे. समाजात मात्र पूर्वी जो सलोखा, एकमेकांविषयीचे प्रेम, आदर, जिव्हाळा होता तो आता लोप पावला आहे. त्यामुळे आपण काही गोष्टीत तरी जुने ते सोने म्हणून नाती जपायला हवीत''

टॅग्स :doctorडॉक्टरDeathमृत्यूHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार