शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कुठे पाणी तर कुठे लाईट नाही! पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची बिकट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 11:41 IST

जिल्ह्यातील ४२८ अंगणवाड्यांना सोलर...

दुर्गेश मोरे

पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एक हजार ३८५ अंगणवड्यांमध्ये अद्यापही वीजजोड नसल्याने भवितव्यच अंधारात गेले आहे. वीजच नाही तर एक हजार २७ अंगणवाड्यात स्वतःचे पाणी कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी मुलांना टाहो फोडवा लागत आहे.

१९८५ पासून एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यान्वित असून चार हजार ६६९ अंगणवाड्यांमधून लाभार्थ्यांना सेवा दिल्या जातात. याद्वारे बालके, गर्भवती महिला, किशोरवीयन मुली, स्तनदा माता यांसाठी विविध उपक्रम राबिवले जातात. या अंगणवाड्यांमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, तरीही अनेक अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत एक हजार २८ अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे मुलांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

जिल्ह्यातील चार हजार ६६९ पैकी एक हजार ३८५ अंगणवाड्यांना स्वत:ची वीजजोड नाही. त्यांना त्वरित वीजजोड देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नुकतीच वीज वितरण कंपनीबरोबर महिला व बाल कल्याण विभागाची बैठक पार पडली. त्यामध्ये वीजजोड तत्काळ देण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये लवकरच वीज उपलब्ध होणार आहे.

याशिवाय जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना उंची मापकपट्टी, डिजिटल वजन काटे, लहान बाळाची उंची मोजण्याची पट्टी देण्यात आली आहे. ही सर्व उपकरणे १ जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ४२८ अंगणवाड्यांना सोलर

अंगणवाड्यांना बिलाची तरतूद नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ४२८ अंगणवाड्यांना सोलर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या बीजबिलात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. वास्तविक जिल्ह्यातील तीन हजार ६०० अंगणवाड्यांचे छत सोलर बसवण्यासारखे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी सोलर बसवण्याचा महिला व बाल विकास विभाग प्रयत्न करणार आहे. दरम्यान, २०३ अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह नसल्याने त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून प्रती अंगणवाडी ४० हजार रुपये ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्या निधीतून या अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील एक हजार ३८५ अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र वीजजोड देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना तीन हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये मीटर, डिपोझिट वगैरेसारख्या गोष्टींवर ही रक्कम खर्च करावयाची आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन वीज वितरणशी समन्वय साधत लवकरात लवकर वीजजोड करून घ्यावी. काही अडचण असल्यास महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा.

जे. बी. गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड