शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशातील ३ पैकी १ महिला शाेषणाचा बळी; अत्याचाराचे प्रमाण वाढतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 20:10 IST

कर्नाटकमध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक...

पुणे : आफताबबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असलेल्या श्रद्धाला तो सातत्याने मारहाण करायचा. त्याची परिणती तिच्या हत्येत झाली. हे वाचल्यानंतर संपूर्ण देश हादरला. पण ही केवळ एक घटना नाही. गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, देशात ३पैकी १ महिला शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरत आहे. यात सहा राज्ये आघाडीवर आहेत.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने (एनएफएनएल-५) ६२ हजार ३८१ महिलांवर केलेल्या संशोधनाच्या आधारावर स्टेटस् ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. अनेक प्रकरणांमध्ये महिला या पती किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांच्या हिंसाचाराचा बळी ठरत असल्याचे समोर आले आहे.

सहा राज्यांमध्ये १८ ते ४९ वय असणाऱ्या विवाहित महिलांचा त्यांच्या पतीकडून शारीरिक किंवा लैंगिक छळ झाल्याचे उघड झाले असून, हे प्रमाण २९.३ टक्के आहे. याशिवाय शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांवरील वैवाहिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील प्रमाण २५.२ टक्के

कर्नाटकामध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ बिहार, मणिपूर, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातही हे प्रमाण २५.२ टक्के आहे.

काय आहे वास्तव?

- शहरी भागात २४ टक्के महिलांना, तर ग्रामीण भागात ३२ टक्के महिलांना पतीच्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

- तब्बल ७० टक्के महिलांना त्यांच्या पतीकडून दारू प्यायल्यानंतर मारहाण करण्यात आली, तर २३ टक्के महिलांना नवऱ्याने दारू न पिताही मारहाण केली आहे.

- भयानक म्हणजे ७७ टक्के महिलांवर शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचार झाला आहे. पण, त्यांनी त्याबद्दल कोणालाही सांगितलं नाही किंवा कुणाचीही मदत मागितली नाही.

- या आकडेवारीनुसार हे सिद्ध होते, की महिला समाजातच काय; पण सात फेरे घेतलेल्या पतीसमवेतही सुरक्षित नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत विवाहीत महिलांचे पतीविरूद्ध तक्रार करण्याचे प्रमाण वाढले आहे. विवाह संस्था धोक्यात आल्याचे हे चित्र आहे.

महिलांवरील अत्याचारासंदर्भात आकडेवारी

कर्नाटक : ४४.४ टक्के

बिहार : ४० टक्के

मणिपूर : ३९.६ टक्के

तमिळनाडू : ३८.१ टक्के

तेलंगणा : ३६.९ टक्के

उत्तर प्रदेश : ३४.८ टक्के

महाराष्ट्र : २५.२ टक्के

शहरी २४.२ टक्के

ग्रामीण ३१.६ टक्के

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड