शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

उत्तर प्रदेशात योगींचे स्थान धोक्यात? २०२२ मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल; उपमुख्यमंत्र्यांनी दिले असे संकेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 17:27 IST

Uttar Pradesh Politics: २०२२ मध्ये भाजपा कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार याबाबत अद्याप अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सूचक संकेत दिले आहे.

लखनौ - पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपानेही (BJP) राज्यातील आपली सत्ता टिकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र २०२२ मध्ये भाजपा कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार याबाबत अद्याप अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Uttar Pradesh Assembly Election 2022) या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सूचक संकेत दिले आहे. २०२२ ची निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. (Yogi Adityanaths' place in Uttar Pradesh in danger? Who will be the face of BJP in 2022; The hints given by the Deputy Chief Minister  KP Maurya)

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केशव प्रसाद मौर्य नेतृत्वाच्या विषयावर माहिती देताना म्हणाले की, २०२२ मध्ये पक्षाचे नेतृत्व कोण करेल, कुणाच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील. हा माझा विषय नाही आहे. तर तो केंद्रीय नेतृत्वाचा विषय आहे. ज्या चर्चांना तुम्ही मंथन वगैरे नाव देत आहात त्या नियमित चर्चा आहे. आता प्रसारमाध्यमे आपले तर्कवितर्क लढवण्यासाठी स्वतंत्र आहेत.  

दरम्यान, ओबीसी पक्षांच्या मुद्द्यांवर केशव प्रसार मौर्य म्हणाले की, ओबीसी समुदाय पक्षावर नाराज नाही आहे. जर अनुप्रिया पटेल, संजय निषाद किंवा निषाद पक्षाबाबत बोलायचे झाल्यास ते आमचे मित्र पक्ष आहेत. आधीपासून आमच्याबरोबर आहेत. आता गरज भासली तर आम्ही अजून पक्षांना सोबत घेऊ.  

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना समजवण्याचा आणि सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा सोबत आणण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नुकतीच अनुप्रिया पटेल आणि निषाद पार्टीचे प्रमुख संजय निषाद यांच्यासोबत चर्चा केली होती. तसेच सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर यांच्यासाठीही आघाडीचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपाला जो फिडबॅक मिळाला आहे त्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील अव्यवस्थेचे आरोप आणि आमदार-खासदारांविरोधात असलेल्या नाराजीमुळे पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतही घट होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची सत्ता पुन्हा कशी येईल याबाबत विचार करण्यासाठी लखनौपासून दिल्लीपर्यंत नेत्यांची चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण