शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार? एनडीएची ताकद वाढणार; मांझींच्या ऑफरनंतर चर्चेला उधाण

By बाळकृष्ण परब | Published: November 13, 2020 9:45 AM

Bihar Assembly Election News : बिहारमध्ये सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देहिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या ऑफऱमुळे नव्या चर्चेचाल तोंड फुटले आहेमांझी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहेबिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या आहेत

पाटणा - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत विजय मिळवला आहे. सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे. एकीकडे तेजस्वी यादव यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला असतानाच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या ऑफऱमुळे नव्या चर्चेचाल तोंड फुटले आहे.बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे नेते जीननराम मांझी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता बिहारमध्येही काँग्रेसमध्ये फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे निवडून आलेले आमदार गोवा, गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये पक्ष सोडून भाजपामध्ये गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मांझी यांच्या ऑफरमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडणे स्वाभाविक आहे.बिहार काँग्रेसमध्येही यापूर्वी फूट पडली होती. २०१७ मध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेत पुन्हा एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह काही नेते काँग्रेस सोडून जेडीयूमध्ये आले होते. सध्या अशोक चौधरी हे जेडीयूचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच नितीश कुमार यांचे खास व्यक्ती बनलेले आहेत. 

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये भाजपाने ७४, जेडीयूने ४३, हम पक्षाने ४ आणि व्हीआयपी पक्षाने ४ जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. त्यामध्ये आरजेडीला ७५, काँग्रेसला १९ आणि डाव्या पक्षांना १६ जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चाcongressकाँग्रेस