शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राष्ट्रवादीत घरवापसी करणार का? निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले वैभव पिचड म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 14:14 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला होता. सत्ता येईल या अपेक्षेने अनेकजण शिवसेना-भाजपात गेले होते.

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात पक्षांतराची चर्चा सुरु आहे. यात निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक आहेत असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी केले होते. त्यानंतर भाजपातला कोणीही पक्ष सोडून जाणार नाही असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला होता. सत्ता येईल या अपेक्षेने अनेकजण शिवसेना-भाजपात गेले होते. यामधील अहमदनगर जिल्ह्यातील नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांचाही समावेश आहे. भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करणार अशा चर्चेबाबत पत्रकारांनी वैभव पिचड यांना प्रश्न विचारला होता.

यावेळी वैभव पिचड म्हणाले की, माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क झाला नाही. मी सध्यातरी दिल्या घरी सुखी आहे असं सूचक विधान केले आहे, तसेच अनेक वृत्तवाहिन्यांनी मी राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे असा फोटो दाखवला. याबाबत मी खुलासादेखील केला आहे. सध्या माझ्या घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही असं मत मांडले आहे. मात्र या वक्तव्यातून भविष्यात काय होईल याचीच चर्चा जिल्ह्यातील राजकारणात सुरु आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. तसेच यावर लवकरच निर्णय घेऊन सार्वजनिक जाहीर केले जाईल, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. तसेच काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले नेते-

उदयनराजे भोसले - सातारा

शिवेंद्रराजे भोसले - सातारा

राणजगजितसिंह पाटील - उस्मानाबाद

धनंजय महाडिक - कोल्हापूर

बबनराव पाचपुते - श्रीगोंदा

रणजितसिंह मोहिते-पाटील - माळशिरस

मधुकर पिचड-वैभव पिचड - अकोले

गणेश नाईक कुटुंब - नवी मुंबई

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा