शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

Raj Thackeray PC: शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 5:18 PM

Raj Thackeray Target Sharad Pawar: प्रबोधनकार ठाकरे हे तुम्हाला परवडणारे नाहीत. आणायचे असेल तर पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते कळेल.

ठळक मुद्देबाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे मी ब्राम्हण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो. जात पाहून आपण कुणाच्या घरात जातो का? या जातीपातीच्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे.राजकारणासाठी एजेंट नेमले गेले त्यांच्याकडून हे पसरवलं जातं. जेम्स लेन कोण? कुठे गेला?

पुणे – महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडला पाहिजे. गेल्या १५-२० वर्षात शाळा-कॉलेजमध्ये जाती आल्या. मित्रामित्रांमध्ये जाती आल्या. महाराष्ट्रानं देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले ते राष्ट्रीय स्तरावर गेले. महाराष्ट्र जातीपातीच्या विचारातून बाहेर पडला पाहिजे यासाठी ते विधान होतं. यात प्रबोधनकारांच्या वाचनांचा प्रश्न कुठून आला? बरं प्रबोधनकारांचे सोयीनुसार तुम्ही वाचन करता का? असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांना लगावला आहे.

राज ठाकरे(Raj Thackeray) पत्रकार परिषदेत म्हणाले की, नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले. जात-धर्माच्या नावावर निवडून लढवली नव्हती. जात, धर्म हे वातावरण तयार करण्यात येत आहे. शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा प्रश्न विचारला होता महाराष्ट्राला एकत्र आणायचं असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणाले. मग तुमच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज न होता शाहू-फुले आंबेडकर विचार घेऊन पुढे जाणार मग छत्रपती शिवाजी महाराज मूळ विचार पुढे का घेऊन जात नाही असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केला.

तसेच बाबासाहेब पुरंदरे(Babasaheb Purandare) यांच्याकडे मी ब्राम्हण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो. शरद पवारांना भेटतो ते मराठा म्हणून भेटतो का? जात पाहून आपण कुणाच्या घरात जातो का? या जातीपातीच्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. मी काय वाचलं हे मला माहित्येय आहे. प्रबोधनकार ठाकरे हे तुम्हाला परवडणारे नाहीत. आणायचे असेल तर पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते कळेल. प्रत्येक काळातील ती गोष्ट असते. चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो पुढे आणावा. ५० साली पहिली आवृत्ती आली तेव्हापासून पुढे आलं नाही. लोकांची माथी भडकवायची. राजकारणासाठी एजेंट नेमले गेले त्यांच्याकडून हे पसरवलं जातं. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्यासाठी आला आणि गायब झाला. त्यामुळे मी बोललो हे सगळं प्लॅन आहे असाही राज ठाकरेंनी आरोप लावला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीपातीचा विचार जास्त प्रमाणात पुढे आला याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. निवडणुकीसाठी जातीपातीचं राजकारण केले जाते. निवडणुकीच्या काळात दोन-चार टाळक्यांचं भलं होतं. ७४ वर्षात आपण जातीपातीचं राजकारण करतोय त्यातून बाहेर पडावं हेच वाटतं असंही राज ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस