शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरी

By प्रविण मरगळे | Updated: November 16, 2020 20:04 IST

Bihar CM Nitish Kumar, BJP News: एवढेच नव्हे, तर नितीश कुमार यांना मागासवर्गीय आणि महादलितांचा चांगला पाठिंबा असल्याचं भाजपाला ठाऊक आहे,

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनाही नितीश कुमार यांनी केलेल्या कामांना पूरक आहेतपक्षाचा हिंदुत्व अजेंडा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा यादवांच्या भूमिकेशिवाय अपूर्ण आहे. नितीश कुमार प्रामुख्याने मागासवर्गीय नेत्यांवर लक्ष केंद्रीत करतात त्यासाठी भाजपा यादवांच्या नेतृत्वांना पुढे आणत आहे.

पटणा – बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. या निवडणुकीत जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या तरीही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना देण्यात आलं. भाजपाने हे करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांचे चांगले संबंध मानले जात आहेत.  इतकचं नाही तर अलीकडेच दोन मोठ्या मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडल्याने जेडीयूला सोबत ठेवणं भाजपासाठी गरजेचे होते असंही म्हटलं जात आहे.

भाजपाने भलेही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना दिलं असलं तरी सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपाचं प्रतिनिधित्व सर्वात जास्त असेल. मागील सरकारपेक्षा यंदाच्या सरकारमध्ये भाजपाचे मंत्री जास्त असतील. यात भाजपा मागासवर्गीय आणि दलित समुदायातील अनेक नेत्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नितीश कुमार प्रामुख्याने मागासवर्गीय नेत्यांवर लक्ष केंद्रीत करतात त्यासाठी भाजपा यादवांच्या नेतृत्वांना पुढे आणत आहे. भाजपाच्या या रणनीतीने आरजेडीला घेरण्याचा प्रयत्न आहे.

भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचा हिंदुत्व अजेंडा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा यादवांच्या भूमिकेशिवाय अपूर्ण आहे. बिहारमध्ये बीएसपी म्हणजे वीज, रस्ते आणि पाणी असा प्रमुख फॅक्टर आहे. ज्यावर मागील काही काळापासून खास काम केले गेले आहे. नवीन आलेलं सरकार आरोग्य, शिक्षा आणि सामाजिक विकास सुधारणेसाठी काम करणार आहे. बिहारमध्ये एनडीए स्थापन करण्यासाठी नितीश कुमारांचे योगदान मोठे आहे.

नव्या सरकारमध्ये या विषयावर भाजपाचं लक्ष

एवढेच नव्हे, तर नितीश कुमार यांना मागासवर्गीय आणि महादलितांचा चांगला पाठिंबा असल्याचं भाजपाला ठाऊक आहे, अशा परिस्थितीत पक्ष हे लक्षात घेऊन पुढे जात आहे. केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनाही नितीश कुमार यांनी केलेल्या कामांना पूरक आहेत, म्हणूनच त्यांनाही सरकारमध्ये नेण्यासाठी भाजपा पावले उचलणार आहे

नितीश कुमार यांची कसोटी लागणार

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री