शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरी

By प्रविण मरगळे | Updated: November 16, 2020 20:04 IST

Bihar CM Nitish Kumar, BJP News: एवढेच नव्हे, तर नितीश कुमार यांना मागासवर्गीय आणि महादलितांचा चांगला पाठिंबा असल्याचं भाजपाला ठाऊक आहे,

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनाही नितीश कुमार यांनी केलेल्या कामांना पूरक आहेतपक्षाचा हिंदुत्व अजेंडा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा यादवांच्या भूमिकेशिवाय अपूर्ण आहे. नितीश कुमार प्रामुख्याने मागासवर्गीय नेत्यांवर लक्ष केंद्रीत करतात त्यासाठी भाजपा यादवांच्या नेतृत्वांना पुढे आणत आहे.

पटणा – बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. या निवडणुकीत जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या तरीही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना देण्यात आलं. भाजपाने हे करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांचे चांगले संबंध मानले जात आहेत.  इतकचं नाही तर अलीकडेच दोन मोठ्या मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडल्याने जेडीयूला सोबत ठेवणं भाजपासाठी गरजेचे होते असंही म्हटलं जात आहे.

भाजपाने भलेही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना दिलं असलं तरी सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपाचं प्रतिनिधित्व सर्वात जास्त असेल. मागील सरकारपेक्षा यंदाच्या सरकारमध्ये भाजपाचे मंत्री जास्त असतील. यात भाजपा मागासवर्गीय आणि दलित समुदायातील अनेक नेत्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नितीश कुमार प्रामुख्याने मागासवर्गीय नेत्यांवर लक्ष केंद्रीत करतात त्यासाठी भाजपा यादवांच्या नेतृत्वांना पुढे आणत आहे. भाजपाच्या या रणनीतीने आरजेडीला घेरण्याचा प्रयत्न आहे.

भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचा हिंदुत्व अजेंडा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा यादवांच्या भूमिकेशिवाय अपूर्ण आहे. बिहारमध्ये बीएसपी म्हणजे वीज, रस्ते आणि पाणी असा प्रमुख फॅक्टर आहे. ज्यावर मागील काही काळापासून खास काम केले गेले आहे. नवीन आलेलं सरकार आरोग्य, शिक्षा आणि सामाजिक विकास सुधारणेसाठी काम करणार आहे. बिहारमध्ये एनडीए स्थापन करण्यासाठी नितीश कुमारांचे योगदान मोठे आहे.

नव्या सरकारमध्ये या विषयावर भाजपाचं लक्ष

एवढेच नव्हे, तर नितीश कुमार यांना मागासवर्गीय आणि महादलितांचा चांगला पाठिंबा असल्याचं भाजपाला ठाऊक आहे, अशा परिस्थितीत पक्ष हे लक्षात घेऊन पुढे जात आहे. केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनाही नितीश कुमार यांनी केलेल्या कामांना पूरक आहेत, म्हणूनच त्यांनाही सरकारमध्ये नेण्यासाठी भाजपा पावले उचलणार आहे

नितीश कुमार यांची कसोटी लागणार

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री