शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोण आहे नीरज गुंडे; देवेंद्र फडणवीस आणि त्याचे संबंध काय आहे?; नवाब मलिकांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 7:01 AM

सगळ्यात आधी या व्यक्तीने अहवाल कसा मिळविला व ट्विट केला? या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी दिली पाहिजेत, असे थेट आव्हान अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.

मुंबई : रश्मी शुक्ला यांचा कथित अहवाल नीरज गुंडे या व्यक्तीने ट्विट केला होता. हा गुंडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा बंगल्यावर, तत्कालीन पोलीस आयुक्त, तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त यांच्या दालनात सतत जात होता. हा व्यक्ती कोण आहे? त्याचे आणि फडणवीस यांचे संबंध काय आहेत? सगळ्यात आधी या व्यक्तीने अहवाल कसा मिळविला व ट्विट केला? या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी दिली पाहिजेत, असे थेट आव्हान अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे.शुक्ला यांनी माफी मागितली होतीमुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी विस्तृत अहवाल दिला आहे. अहवालात रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची येऊन माफी मागितली, त्यांच्या परिवारातील अडचणी सांगितल्यामुळे सहानुभूती म्हणून त्यांच्यावर कारवाई केली नव्हती, हे देखील अहवालात नमूद आहे. 

एनआयए ‘त्यांचा’ जबाब कधी घेणार?

मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा डीव्हीआर गायब झाला असून, एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या १८ दिवसांपासून एनआयएने सचिन वाझे यांच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा जबाब घेतला नाही, हे आश्चर्याचे आहे. सदर डीव्हीआर गायब करण्याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करत नसेल तर राज्य सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, १० मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसराचा डीव्हीआर एटीएसने अधिकृतरीत्या ताब्यात घेतला, परंतु दोनच तासांमध्ये हा डीव्हीआर एटीएसला देऊन चूक झाली, असे लक्षात आल्याने एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून फोन गेला. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकRashmi Shuklaरश्मी शुक्ला