शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

दिंडोरीत माकपच्या उमेदवारीचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 05:05 IST

युती-आघाडीकडून आयात उमेदवार; राजी-नाराजीचा दोघांनाही फटका

- श्याम बागुलदिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत देत असलेल्या युती व आघाडीने आयात उमेदवारांनाच संधी दिल्याने दोन्ही पक्षांना राजी-नाराजीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, त्यात माकपने उमेदवारी जाहीर करून दोन्ही पक्षांपुढे पेच निर्माण केला आहे. माकपची उमेदवारी नेमकी कोणाला तारते आणि कोणाला मारते यावरच युती व आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.आदिवासी व बिगर आदिवासी मतदारांचा समावेश असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ऐवजी गेल्या निवडणुकीत भाजपविरुद्ध लढणाऱ्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्टÑवादीने डॉ. भारती पवार यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली.ज्याप्रमाणे भाजपने उमेदवार बदलल्यामुळे नाराजीची भावना आहे, त्याचप्रमाणे, राष्टÑवादीमध्येदेखील आयात उमेदवारामुळे नाराजी बोलून दाखविली जात आहे. नेमका त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांनी चालविला आहे.आदिवासी कोकणा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातील प्रमुख तिन्ही उमेदवार त्याच समाजातील आहेत, शिवाय तिघांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. डॉ. भारती पवार यांचे सासरे दिवंगत ए. टी. पवार हे आठ वेळा आमदार राहिले आहेत. तर धनराज महालेयांचे वडील दिवंगत हरिभाऊ महाले हे तीन वेळा खासदार व दोन वेळा आमदार राहिले आहेत. जिवा पांडू गावित सात वेळा सुरगाणा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार राजकीयदृष्ट्या ताकदीचे असल्याने कोण बाजी मारतो याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आघाडीसाठी शरद पवार तसेच माकपासाठी सीताराम येचुरी यांची सभा या मतदारसंघात झाली. माकपाने मतदारसंघात जागर यात्रा काढून वातावरण निर्मिती केली आहे. प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत असली, तरी कोण कोणाची मते खातो, यावर गणिते अवलंबून आहे. तूर्त प्रत्येकाची लढाई जिंकण्यासाठी व प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी आहे.गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घरोघरी स्वच्छतागृह उभारण्यास प्रोत्साहन देऊन माता, भगिनींची अब्रू वाचविली. शेतमालाला भाव व शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले. आयुष्यमान योजनेने गरिबांचा उपचार खर्च उचलला.- डॉ. भारती पवार, भाजपसर्वच पातळीवर सरकार अयशस्वी ठरले. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. उलट नोटबंदी, जीएसटीने जनता, शेतकºयांची फसवणूक केली. बेरोजगारी वाढविली. फसवे सरकार गेले पाहिजे.- धनराज महाले, राष्टÑवादीकळीचे मुद्देशेतमालाचे कोसळलेले भाव, गुजरातला वाहून जाणारे पाणीखासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भाजपच्या मदतीविषयी साशंकता, कॉँग्रेस कार्यकर्ते प्रचारापासून दूर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019dindori-pcदिंडोरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस