शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत माकपच्या उमेदवारीचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 05:05 IST

युती-आघाडीकडून आयात उमेदवार; राजी-नाराजीचा दोघांनाही फटका

- श्याम बागुलदिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत देत असलेल्या युती व आघाडीने आयात उमेदवारांनाच संधी दिल्याने दोन्ही पक्षांना राजी-नाराजीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, त्यात माकपने उमेदवारी जाहीर करून दोन्ही पक्षांपुढे पेच निर्माण केला आहे. माकपची उमेदवारी नेमकी कोणाला तारते आणि कोणाला मारते यावरच युती व आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.आदिवासी व बिगर आदिवासी मतदारांचा समावेश असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ऐवजी गेल्या निवडणुकीत भाजपविरुद्ध लढणाऱ्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्टÑवादीने डॉ. भारती पवार यांच्याऐवजी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली.ज्याप्रमाणे भाजपने उमेदवार बदलल्यामुळे नाराजीची भावना आहे, त्याचप्रमाणे, राष्टÑवादीमध्येदेखील आयात उमेदवारामुळे नाराजी बोलून दाखविली जात आहे. नेमका त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांनी चालविला आहे.आदिवासी कोकणा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातील प्रमुख तिन्ही उमेदवार त्याच समाजातील आहेत, शिवाय तिघांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे. डॉ. भारती पवार यांचे सासरे दिवंगत ए. टी. पवार हे आठ वेळा आमदार राहिले आहेत. तर धनराज महालेयांचे वडील दिवंगत हरिभाऊ महाले हे तीन वेळा खासदार व दोन वेळा आमदार राहिले आहेत. जिवा पांडू गावित सात वेळा सुरगाणा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार राजकीयदृष्ट्या ताकदीचे असल्याने कोण बाजी मारतो याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आघाडीसाठी शरद पवार तसेच माकपासाठी सीताराम येचुरी यांची सभा या मतदारसंघात झाली. माकपाने मतदारसंघात जागर यात्रा काढून वातावरण निर्मिती केली आहे. प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत असली, तरी कोण कोणाची मते खातो, यावर गणिते अवलंबून आहे. तूर्त प्रत्येकाची लढाई जिंकण्यासाठी व प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी आहे.गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घरोघरी स्वच्छतागृह उभारण्यास प्रोत्साहन देऊन माता, भगिनींची अब्रू वाचविली. शेतमालाला भाव व शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले. आयुष्यमान योजनेने गरिबांचा उपचार खर्च उचलला.- डॉ. भारती पवार, भाजपसर्वच पातळीवर सरकार अयशस्वी ठरले. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. उलट नोटबंदी, जीएसटीने जनता, शेतकºयांची फसवणूक केली. बेरोजगारी वाढविली. फसवे सरकार गेले पाहिजे.- धनराज महाले, राष्टÑवादीकळीचे मुद्देशेतमालाचे कोसळलेले भाव, गुजरातला वाहून जाणारे पाणीखासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भाजपच्या मदतीविषयी साशंकता, कॉँग्रेस कार्यकर्ते प्रचारापासून दूर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019dindori-pcदिंडोरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस