शहरांची नावे बदलून काय होणार?; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 04:44 PM2021-01-01T16:44:45+5:302021-01-01T16:46:17+5:30

भाजपकडून तेढ निर्माण करणारं राजकारण; थोरातांचा आरोप

What is the use of renaming of the cities asked congress leader Balasaheb Thorat | शहरांची नावे बदलून काय होणार?; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल

शहरांची नावे बदलून काय होणार?; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल

Next

संगमनेर (जि. अहमदनगर)  : सर्वसामान्य माणसांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहरांची नावे बदलून काय होणार? भारतीय जनता पक्षाचे राजकारण विकासाच्या मुद्द्यांवर नाही. निवडणुका तोंडावर आल्या की त्यांच्याकडून भावनिक मुद्दा पुढे करत समाजात तेढ निर्माण करणारे विषय पुढे आणले जातात.,अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेरातील यशोधन जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी ( १ जानेवारी) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यावेळी उपस्थित होत्या.

 

Web Title: What is the use of renaming of the cities asked congress leader Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.