शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना काय सांगितलं? संजय राऊत यांनी गुपित उघड केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 13:36 IST

Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आय़ोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती.

मुंबई - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आय़ोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांच्यात काय चर्चा झाली याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला होती. दरम्यान, या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली आणि त्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना काय सांगितलं याचं गुपित संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उघड केलं आहे. (What did Uddhav Thackeray tell Sonia Gandhi in the meeting? Sanjay Raut revealed the secret)

संजय राऊत म्हणाले की,  काल सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत १९ पक्षांचे नेते उपस्थित होते. स्वतः मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला. तो म्हणजे आज आपल्या समोर सत्ता नाही. पण आज आपण एकत्र आलोय. पण यानंतर जर सत्ता समिप दिसत असेल किंवा सत्तेची खुर्ची दिसत असेल, तेव्हा सुद्धा आपण सर्वानी एकत्र राहील पाहिजे.

दरम्यान, सध्या अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्षामुळे चर्चेत आलेल्या तालिबानबाबतही संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, तालिबान वाढत आहे हे सत्य आहे. तसेच तालिबानला पाकिस्तान आणि चीन चा पाठिंबा आहे हे देखील सर्वाना माहीत आहे. तेव्हा भारत सरकारने या शत्रू देशांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना एक प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. हे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वाना माहीत आहे. बाबरी मस्जिद पडल्यानंतर ज्यांनी हात वर केले होते त्यांनी शिवसेने बद्दल बोलू नये. जेव्हा मुंबईत १९९३ ला पाकिस्तानने दंगली उसळल्या तेव्हा देखील  शिवसेनेने आपले हिंदुत्व दाखवले होते. त्यामुळे शिवसेनेनेला असले टोन्ट मारू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस