शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठीचे योगदान काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:28 IST

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

मुरुड : रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिवसेना व भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवायचे, आमच्याबद्दल भीती निर्माण करावयाची व मुस्लिमांची मते मिळवायची; परंतु या राष्ट्रवादी व शेकापने एवढ्या वर्षात ही मते घेऊन मुस्लीम समाजासाठी कोणते विधायक काम केले आहे. फक्त मते घेतलीत, विधायक काम काही नाही. मतांच्या जीवावर या मंडळींनी कोट्यवधींची माया जमवली, म्हणूनच ही निवडणूक मी भ्रष्टचार विरुद्ध लढत असून या निवडणुकीत सदाचाराचा विजय निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरुड शहरात झालेल्या जाहीर सभेत केले आहे.मुरुड शहरात शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी गीते बोलत होते. अनंत गीते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक आहे.

आपल्या महाराष्ट्रात सिंचन घोटाळा घडल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांंना आत्महत्या करावी लागली आहे; परंतु हेच पैसे जर सिंचनात लागू केले असते तर बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नवीद अंतुले यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश म्हणजे ही एक ऐतिहासिक घटना असून नवीदला रायगड जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद भेटत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मला हरवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले तरी मला त्यांचे आव्हान वाटत नाही. जनता सुज्ञ असून कोणाला मतदान करायचे हे त्यांना चांगले अवगत आहे. पुढील काळात कोकणाला सतावणारे प्रमुख प्रश्न पाणी व रस्ते यासाठी पाच हजार कोटी रुपये केंद्राकडून आणून विशेष विकास करणार असून, कोणताही तालुका टँकरग्रस्त राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. पैशाच्या मस्तीवर निवडणूक जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत, मतदार हुशार झाला आहे. लोकांना कोण चांगला व वाईट हे कळत असून आगामी निवडणुकीत याची प्रचिती येणार आहे. पुढील काळात मुरुड नगरपरिषदेस केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगितले.
नवीद अंतुले यांनी कोकणच्या विकासाला खरी चालना शिवसेनाच देऊ शकते यासाठीच मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उस्मान रोहेकर यांनी सांगितले की, मीना बाजारातील ५२ गाळे तोडले गेले व शेकडो लोक बेरोजगार झाले, गाळे तोडणार नाही, असे आश्वासन सुनील तटकरे यांनी दिले होते; परंतु नंतर फसवणूक केली, अशा लोकांचे शाप तटकरे यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असे ते या वेळी म्हणाले.यावेळी नवीद अंतुले, भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस