शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठीचे योगदान काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:28 IST

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

मुरुड : रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भ्रष्ट प्रवृत्तीची असून, ही संस्थाने खालसा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिवसेना व भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवायचे, आमच्याबद्दल भीती निर्माण करावयाची व मुस्लिमांची मते मिळवायची; परंतु या राष्ट्रवादी व शेकापने एवढ्या वर्षात ही मते घेऊन मुस्लीम समाजासाठी कोणते विधायक काम केले आहे. फक्त मते घेतलीत, विधायक काम काही नाही. मतांच्या जीवावर या मंडळींनी कोट्यवधींची माया जमवली, म्हणूनच ही निवडणूक मी भ्रष्टचार विरुद्ध लढत असून या निवडणुकीत सदाचाराचा विजय निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरुड शहरात झालेल्या जाहीर सभेत केले आहे.मुरुड शहरात शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी गीते बोलत होते. अनंत गीते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक आहे.

आपल्या महाराष्ट्रात सिंचन घोटाळा घडल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांंना आत्महत्या करावी लागली आहे; परंतु हेच पैसे जर सिंचनात लागू केले असते तर बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नवीद अंतुले यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश म्हणजे ही एक ऐतिहासिक घटना असून नवीदला रायगड जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद भेटत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मला हरवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले तरी मला त्यांचे आव्हान वाटत नाही. जनता सुज्ञ असून कोणाला मतदान करायचे हे त्यांना चांगले अवगत आहे. पुढील काळात कोकणाला सतावणारे प्रमुख प्रश्न पाणी व रस्ते यासाठी पाच हजार कोटी रुपये केंद्राकडून आणून विशेष विकास करणार असून, कोणताही तालुका टँकरग्रस्त राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. पैशाच्या मस्तीवर निवडणूक जिंकण्याचे दिवस आता संपले आहेत, मतदार हुशार झाला आहे. लोकांना कोण चांगला व वाईट हे कळत असून आगामी निवडणुकीत याची प्रचिती येणार आहे. पुढील काळात मुरुड नगरपरिषदेस केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगितले.
नवीद अंतुले यांनी कोकणच्या विकासाला खरी चालना शिवसेनाच देऊ शकते यासाठीच मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उस्मान रोहेकर यांनी सांगितले की, मीना बाजारातील ५२ गाळे तोडले गेले व शेकडो लोक बेरोजगार झाले, गाळे तोडणार नाही, असे आश्वासन सुनील तटकरे यांनी दिले होते; परंतु नंतर फसवणूक केली, अशा लोकांचे शाप तटकरे यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असे ते या वेळी म्हणाले.यावेळी नवीद अंतुले, भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस