शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

West Bengal Violence: अशी ‘ही’ बनवाबनवी! बंगाल हिंसाचारातील पीडित म्हणून भाजपानं चक्क पत्रकाराचाच फोटो वापरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 3:14 PM

BJP has posted a video on its social media handles attacking the TMC: या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं आहे

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेतबंगालच्या विविध भागात जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीचे प्रकार सुरू आहेत. टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला होत असल्याचा आरोप

कोलकाता – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पार्टीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. बंगालमधील या घटनांचा निषेध करण्यासाठी भाजपाने संपूर्ण देशभरात धरणं आंदोलनही केले होते. बुधवारी भाजपाच्या बंगाल पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.

या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं आहे. पण भाजपाने या व्हिडीओत ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनेलचा पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाने ९ लोकांच्या नावाची यादी जारी केली आहे. ज्यात मोमिक मोइत्रा, मिंटू बर्मन यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु माणिक मोइत्रा नावाने कोणाची ओळख पटली नाही.

या व्हिडीओवरून वाद-विवाद झाल्यानंतर भाजपाने हा व्हिडीओ ट्विटरवरून हटवला आहे. मात्र त्याआधीच हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला होता. भाजपाने ५.२८ मिनिटांचा एक व्हिडीओ बुधवारी जारी केला. जो भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला होता. हा व्हिडीओ १२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला. व्हिडीओत जो फोटो लावला होता तो इंडिया टूडेचे पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा होता

या प्रकरणात अभ्रो बनर्जी यांनी सांगितले की, आज सकाळी उठण्यासाठी मला थोडा वेळ झाला. तेव्हा मोबाईलवर पाहिलं की १०० पेक्षा अधिक मिस कॉल येऊन गेले. एवढे मिसकॉल पाहून मला धक्का बसला त्यानंतर अरविंद नावाच्या मित्राने फोन करून सांगितलं भाजपाच्या आयटी सेलने माणिक मोइत्राऐवजी तुझ्या फोटोचा वापर केला आहे. हा व्हिडीओ पाहून मी चकीत झालो असं त्यांनी म्हटलं. इतकचं नाही तर मी इथं १४०० किमी दूर आहे. परंतु एखादी चुकीची माहिती किती धोकादायक ठरू शकते. अभ्रो बनर्जी सध्या दिल्लीत आहेत आणि ते न्यूज चॅनेलमध्ये काम करतात.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना

पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सुरू झालेला हिंसाचार अद्यापही शांत झाला नाही. बंगालच्या विविध भागात जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीचे प्रकार सुरू आहेत. टीमसीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात येत आहेत. त्यात अनेकांचा जीव गेलाय असा आरोप भाजपाने केला आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी