शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

West Bengal Results 2021 : "फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्यांना जनतेने नाकारलं", मेहबुबा मुफ्तींकडून ममतांचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:47 IST

West Bengal Results 2021 Mehbooba Mufti And Mamata Banerjee : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी देखील ममतांच्या दमदार कामगिरीचं भरभरून कौतुक केलं आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा दाखवून दिला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर भारतीय जनता पक्षाला ७५ च्या आसपास जागांवर यश मिळताना दिसत आहे. ममता बॅनर्जींचा पराभव करण्यासाठी, राज्यात सत्ताबदल घडवण्यासाठी भाजपनं जंगजंग पछाडलं. मात्र तरीही ममता बॅनर्जींनी हॅटट्रिक केली आहे. याच दरम्यान अनेक नेते ममता बॅनर्जींचं कौतुक करत आहेत. त्यांना शुभेच्छा देत आहेत. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी देखील ममतांच्या दमदार कामगिरीचं भरभरून कौतुक केलं आहे. फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्या पक्षांना पश्चिम बंगालमधील नागरिकांनी नाकारलं असं म्हटलं आहे. 

 ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला आहे. चुरशीच्या लढतीत दिदींनी माजी सहकाऱ्याला पराभूत केले आहे. पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. "ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे आज मिळालेल्या जबरदस्त विजयाबद्दल अभिनंदन. पश्चिम बंगालच्या लोकांनी फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्या पक्षांना नाकारले. त्यासाठी येथील लोक कौतुकास पात्र आहेत" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे.

"पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय"; अखिलेश यादवांचा मोदींना सणसणीत टोला

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आणि भाजपाला (BJP) सणसणीत टोला लगावला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय असं म्हणत अखिलेश यांनी निशाणा साधला आहे. तसेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा. भाजपाने एका महिलेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचं जनतेनं दिलेलं उत्तर आहे. 'दीदी ओ दीदी'ला चोख प्रत्युत्तर दिलं आहे" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीwest bengalपश्चिम बंगालAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण