शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

हीच ती वेळ! उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींना पत्र; देशात महाआघाडी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 17:01 IST

भाजपला टक्कर देण्याची तयारी; ठाकरे, पवार, गांधींना पाठवलेल्या पत्रामुळे देशात महाआघाडी?

कोलकाता/नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी सलग तिसरी निवडणूक जिंकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. (west bengal election lets fight bjp unitedly cm mamata banerjee writes to sonia gandhi sharad pawar uddhav thackeray)"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण'बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं असताना ममता बॅनर्जींनी देशातल्या भाजपेतर पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं आहे. भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरोधात एकजुटीनं उभं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्याला सोबत येऊन भाजपचा मुकाबला करायला हवा, असं आवाहन बॅनर्जींनी केलं आहे.फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदानममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगन रेड्डी, के. एस. रेड्डी, फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांनी पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.नॅशनल कॅपिटल टेरिटरी कायद्यातील सुधारणेला विरोधमोदी सरकारनं संसदेत नॅशनल कॅपिटल टेरिटरी कायद्यात सुधापणा करणारं विधेयक मंजूर केलं. या विधेयकाला बॅनर्जींनी विरोध दर्शवला. मोदी सरकारनं पारित करून घेतलेलं विधेयक संघराज्य पद्धतीला धक्का लावणारं असल्याचं बॅनर्जींनी पत्रात म्हटलं आहे. विरोधी पक्षाची सरकारं असलेल्या राज्यांमध्ये अशाच प्रकारे राजकारण सुरू आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून लोकनियुक्त सरकारच्या कारभारात अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा