शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांनी फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं, आता दोघांनीही राजीनामा द्यावा; नवाब मलिक यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 17:47 IST

पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचं आव्हान फोडून काढत घवघवीत यश प्राप्त केल्याचं सध्याच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींचेच सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला

"देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शहा यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हाच आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे अमित शहा आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा", असं नवाब मलिक म्हणाले आहेत. (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi)

"ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय? भाजपाने पंढरपूरमध्ये तुम्हाला घरात शिरून ठोकलंय"

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारात फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं होतं. अबकी बार २०० पार असा प्रचार केला गेला होता. मग आता काय झालं? निवडणूक निकालाचं मोदी आणि शहा यांनी उत्तर द्यायला हवं, असंही मलिक म्हणाले. 

चार M अन् भाजपचा गेम! एकट्या दीदी मोदी-शहांवर भारी; M फॅक्टरनं बजावली मोलाची कामगिरी

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेस सध्या 209 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 81 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदार संघावर सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं होतं. या मतदार संघातून ममता बॅनर्जी आणि तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांनी ३७२७ मतांनी विजय साजरा केला आहे.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१NCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी