शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

"एकजूट झाले ३० टक्के मुसलमान, तर भारतात बनतील चार पाकिस्तान,’’ तृणमूलच्या नेत्याची मुक्ताफळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 16:28 IST

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान, काही नेते पातळी सोडून आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांनी असेच एक संतापजनक विधान केले आहे.

कोलकाता - संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला २७ मार्चपासून सुरुवात होत आहे. (West Bengal Assembly Elections 2021 )आज संध्याकाळी राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार संपणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. या प्रचारादरम्यान, काही नेते पातळी सोडून आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांनी असेच एक संतापजनक विधान केले आहे. ( "30 per cent Muslims unite, four Pakistan will be formed in India," says Trinamool leader Sheikh Alam)

मिळत असलेल्या माहितीनुसार वीरभूम जिल्ह्यातील नानूर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विधानचंद्र मांझी यांचा प्रचार करण्यासाठी शेख आलम हे आले होते. त्यावेळी शेख आलम म्हणाले की, जर भारतातील ३० टक्के मुसलमान एकजूट झाले तर भारतामध्ये चार नवे पाकिस्तान बनू शकतात. दरम्यान, शेख आलम यांच्या विधानावरून भाजपाने तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे.  आलम यांच्या या विधानावर भाजपाचे पश्चिम बंगालमधील सह प्रभारी अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जींना सवाल विचारला आहे. ममता बॅनर्जी आलम यांच्या विधानाला पाठिंबा देतात काय. आपल्याला असा बंगाल हवा आहे का? असा सवाल  अमित मालवीय यांनी विचारला आहे. 

 

दरम्यान २०१६ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही अशाच प्रकारचे विधान एका मंत्र्याने केले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हुसेन यांनी मिनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. फिरहाद हकीम पाकिस्तानच्या एका पत्रकाराला मी तुम्हाला आता कोलकाताधील मिनी पाकिस्तानमध्ये घेऊन जातो, असे म्हटले होते. त्यावेळी त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली होती.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा