शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

By बाळकृष्ण परब | Updated: May 3, 2021 17:41 IST

Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

ठळक मुद्देसर्वतोपरी प्रयत्न करूनही भाजपाला पश्चिम बंगालमध्ये जेमतेम ८० जागाही जिंकता आल्या नाहीतभाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि करण्यात येत असलेले दावे याच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या जागा फार कमी मात्र २०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकांशी तुलना केली असता अगदी पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये अस्तित्वातही नसलेल्या भाजपाने अल्पावधीत घेतलेली झेप लक्षवेधी

- बाळकृष्ण परब संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंदालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनेभाजपाला धोबीपछाड देत दणदणीत विजय मिळवला. (West Bengal Assembly Election 2021) बंगालमध्ये नरेंद्र  मोदींच्या (Narendra Modi) झंझावाती सभा आणि दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या अमित शाहांच्या ( Amit Shah) आक्रमक प्रचारानंतरही भाजपाला १०० जागाही जिंकता आल्या नाहीत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. ( BJP loses in West Bengal! Did Narendra Modi- Amit Shah's charisma really end?)

२०१९ च्या लोकसभा निलडणुकीत पश्चिम बंगालमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यानंतर भाजपाला बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पडू लागले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी बंगालवर लक्ष केंद्रीत केले. तसेच बंगालमधील सत्ताधारी असलेल्या ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केले. ममतांचे निकटवर्तीय असलेल्या अनेक नेत्यांनाही भाजपात आणले. मात्र एवढे सर्व करूनही भाजपाला पश्चिम बंगालमध्ये जेमतेम ८० जागाही जिंकता आल्या नाहीत. भाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि करण्यात येत असलेले दावे याच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या जागा फार कमी आहेत. त्यामुळे मोदी, शाहांचा करिश्मा संपला असे दिसणे साहजिकच आहे.

मात्र २०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकांशी तुलना केली असता अगदी पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये अस्तित्वातही नसलेल्या भाजपाने अल्पावधीत घेतलेली झेप लक्षवेधी आहे. या निवडणुकीत भाजपाला ७५ च्या आसपास जागा आणि ३७ टक्के मते मिळाली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला १८ जागा आणि ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. याचा अर्थ बंगालमध्ये भाजपाने आपला हक्काचा हिंदुत्वाच्या विचारावर आधारित मतदार उभा केला आहे, असा होतो. दुसरीकडे एकेकाळी बंगालमध्ये दीर्घकाळ सत्तेत राहणारे काँग्रेस आणि डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. तसेच त्यांना फारशी मतेही मिळालेली नाहीत. त्यामुळे बंगालमधील विरोधी पक्षाची पूर्ण स्पेस भाजपाला मिळाली आहे. याचा भाजपाला भविष्यात भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे बंगालची निवडणूक भाजपा हरला तरी आता रातोरात भाजपाला उतरती कळा लागेल, असे म्हणणे थोडेसे घाईचे ठरेल. 

दुसरीकडे भाजपाने आसाममधील सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. येथे एनआरसीसारखे मुद्दे असतानाही भाजपाने २०१६ एवढ्याच जागा घेत विजय मिळवला. आसाममध्ये एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती भाजपाच्या पथ्यावर पडली. तर दुसरीकडे दक्षिण भारतात केरळमध्ये भाजपाला करिश्मा दाखवता आला नसला तरी तामिळनाडूनमध्ये कमल हसन या प्रसिद्ध अभिनेत्याला भाजपाच्या उमेदवाराने पराभवाचा धक्का दिला. तर पाँडेचेरीमध्ये काँग्रेसचे आव्हान मोडून काढत एनडीए सत्तेवर आली आहे. त्याबरोबरच देशातील विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांपैकी, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांत भाजपाने विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपाचा बंगालमध्ये पराभव झाला असला तरी मोदी-शाहांचा करिश्मा ओसरला असे म्हणता. येणार नाही. मात्र पश्चिम बंगालच्या निकालांनी तगडा प्रतिस्पर्धी असेल तर मोदी-शाहांना रोखता येऊ शकते हे मात्र दाखवून दिले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा