शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर

By कुणाल गवाणकर | Updated: September 27, 2020 15:40 IST

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये गुप्त बैठक; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल जोरदार चर्चा झाली. ही बैठक सामनाच्या मुलाखतीबद्दल चर्चा करण्यासाठी झाल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मात्र तरीही या भेटीमागे नेमकं कोणतं राजकारण दडलंय, याची चर्चा सुरूच आहे.फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण..."राज्यात सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भाष्य केलं. फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यास शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला. त्यावर आम्हाला सत्ता स्थापनेची कोणतीही घाई नाही. हे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करणार नाही, असं दानवे यांनी म्हटलं.संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देताच दानवेंनी भाजपकडे असणाऱ्या संख्याबळाकडे लक्ष वेधलं. 'विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या. मात्र सत्ता स्थापनेसाठी त्या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे एखादा आमदारांचा मोठा गट आमच्यासोबत येतो का, ते आम्ही पाहिलं. त्यातूनच पहाटेचा शपथविधी झाला. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. आता महाविकास आघाडीचं सरकार पडल्यास आम्ही सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार नाही. कारण त्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ आमच्याकडे नाही,' असं दानवेंनी सांगितलं.मुलाखतीच्या आड राजकारण; फडणवीस-राऊत भेटीने भूकंपगेल्या वर्षी नेमकं काय घडलं?गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महिनाभर सत्तासंघर्ष सुरू होता. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना भाजपपासून दूर गेली. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. मात्र या तीन पक्षांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्यासोबत होते. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं काही तासांमध्येच हे सरकार कोसळलं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाraosaheb danveरावसाहेब दानवे