शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर

By कुणाल गवाणकर | Updated: September 27, 2020 15:40 IST

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये गुप्त बैठक; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल जोरदार चर्चा झाली. ही बैठक सामनाच्या मुलाखतीबद्दल चर्चा करण्यासाठी झाल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मात्र तरीही या भेटीमागे नेमकं कोणतं राजकारण दडलंय, याची चर्चा सुरूच आहे.फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण..."राज्यात सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भाष्य केलं. फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यास शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला. त्यावर आम्हाला सत्ता स्थापनेची कोणतीही घाई नाही. हे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करणार नाही, असं दानवे यांनी म्हटलं.संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देताच दानवेंनी भाजपकडे असणाऱ्या संख्याबळाकडे लक्ष वेधलं. 'विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या. मात्र सत्ता स्थापनेसाठी त्या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे एखादा आमदारांचा मोठा गट आमच्यासोबत येतो का, ते आम्ही पाहिलं. त्यातूनच पहाटेचा शपथविधी झाला. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. आता महाविकास आघाडीचं सरकार पडल्यास आम्ही सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार नाही. कारण त्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ आमच्याकडे नाही,' असं दानवेंनी सांगितलं.मुलाखतीच्या आड राजकारण; फडणवीस-राऊत भेटीने भूकंपगेल्या वर्षी नेमकं काय घडलं?गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महिनाभर सत्तासंघर्ष सुरू होता. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना भाजपपासून दूर गेली. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. मात्र या तीन पक्षांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्यासोबत होते. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं काही तासांमध्येच हे सरकार कोसळलं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाraosaheb danveरावसाहेब दानवे