शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

“घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्ष मदत करू”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

By प्रविण मरगळे | Updated: October 19, 2020 15:40 IST

CM Uddhav Thackeray Press Conference News: मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं.

ठळक मुद्देबिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावं मग पंतप्रधानही घराबाहेर पडतीलराज्याची आणि देशाची काळजी घेणे हे सरकारचं कर्तव्य आहे, पक्षपातीपणाने बघू नयेबिहारमध्ये प्रचाराला जाण्यापेक्षा राज्यातील संकटासाठी एकत्र येऊन केंद्राकडे जाऊन मदत मागूया

सोलापूर – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल, त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

पाहणी दौरा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  पावसाळा सुरुवात झाल्यापासून मी सातत्याने संपर्कात आहे, नुकसान किती होतेय, पावसाचा अंदाज याची माहिती घेत होतो, टार्गेट दिल्यासारखं पाऊस सगळीकडे पडतोय. ७२ वर्षात असा पाऊस पाहिला नाही असं एका वयोवृद्ध शेतकऱ्याने सांगितलं आहे. शेतकरी आणि आपत्तीग्रस्त हे संकटाच्या डोंगराखाली अडकलेले आहेत, त्या लोकांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आम्ही इथं आलोय, सरकारकडून जे जे काही करणे आवश्यक आहे ते लोकांसाठी आम्ही करू, हे सरकार तुमचं आहे, परतीचा पाऊस आणखी किती दिवस चालेल, त्याचा फटका कितपत बसेल याचा अंदाज आला आहे. दुर्दैवाने ज्यांच्या घरातील माणसं दगावली त्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सावध राहा, प्राणहानी होऊ नये अशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच केंद्राकडे मदत मागण्यास गैर काय? पंतप्रधानांनी फोन करून सांगितलं आहे, चिंता करू नये, आवश्यक मदत करणार असं आश्वासन दिलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे, त्यांनी काय बोलावं, मागावं यापेक्षा त्यांचे दु:ख ओळखून आम्ही त्यांना मदत करणार आहोत, बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावं मग पंतप्रधानही घराबाहेर पडतील, केंद्र सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशाचं सरकार नाही, राज्याची आणि देशाची काळजी घेणे हे सरकारचं कर्तव्य आहे, पक्षपातीपणाने बघू नये. बिहारमध्ये प्रचाराला जाण्यापेक्षा राज्यातील संकटासाठी एकत्र येऊन केंद्राकडे जाऊन मदत मागूया. मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे, जनावरांना चाराही उरला नाही, पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी आलं नाही, १०० टक्के शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे वैगेरे या भानगडीत न पडता तात्काळ मदत केली पाहिजे, जनावारांना चारा दिला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने पाऊलं उचलावी, अतिवृष्टी झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, परंतु राज्य सरकारने प्राथमिक जबाबदारी ओळखून तात्काळ मदत केली पाहिजे, मागील वर्षी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर मी १० हजार कोटी तातडीने मदत जाहीर केली, केंद्र सरकारचं पथक येईल, नुकसान भरपाईचा आढावा घेईल, राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही, केंद्र सरकार मदत करणार आहे, पण तोपर्यंत राज्य सरकारने मदत करायला हवी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली होती.

तर सोयीस्कर राजकीय भूमिका कोणीच घेऊ नये, मदत कशी मिळते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको, ही त्यांची मागणी आहे. राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद ही वेळ नाही, राज्यपालांसोबत मनभेद असतील तर यापुढे होतील, पण आता शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणे गरजेचे आहे. शरद पवारांना सरकारला पाठिशी घालावं लागतंय, या सरकारला पाठिशी घालणं एवढचं काम सरकारकडे आहे. राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकले नव्हते, आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळेजण आता घराबाहेर पडले आहेत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला होता. त्यावर सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी प्रतिटोला हाणला आहे.  

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरFarmerशेतकरी