शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

Vidhan Sabha Adhiveshan: सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 13:36 IST

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली.

ठळक मुद्देआशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आला. विधानसभा दालनात तालिका अध्यक्षांना कुठल्याही पद्धतीची धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी दावा केला.तालिका अध्यक्षांवर दबाव टाकणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी अशी शिवसेनेने मागणी केली

मुंबई – विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. ओबीसी आरक्षणावरून विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं चित्र दिसलं. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच सभागृहात ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. विधानसभेचे कामकाज १० मिनिटं स्थगित करण्यात आलं.

विधानसभा दालनात काय झालं?

विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात बोलू दिलं नाही असा आरोप करण्यात आला. यावेळी भास्कर जाधव आणि विरोधी आमदारांची धक्काबुक्की झाली. त्यानंतर आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आला. मात्र विधानसभा कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी तालिका अध्यक्षांवर दबाव टाकणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली. विधानसभेत पुन्हा गोंधळ झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी सभागृहाचं कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी स्थगित केले. मात्र विधानसभा दालनात तालिका अध्यक्षांना कुठल्याही पद्धतीची धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी दावा केला.

विधानसभेत छगन भुजबळ काय म्हणाले?

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पत्र पाठवलं होतं, पंकजा मुंडे, रामदास आठवले यांनीही पत्र पाठवून इम्पिरिकल डेटा देण्याबाबत केंद्र सरकारला कळवलं होतं. १ ऑगस्ट २०१९ ला देवेंद्र फडणवीसांनी पत्र पाठवलं होतं. २०१७ मध्ये कोर्टात याबाबत सुनावणी सुरू असताना २०१९ पर्यंत फडणवीस सरकारने काहीच केले नाही. इम्पिरिकल डेटा उज्ज्वला गॅससाठी वापरला जातो पण ओबीसींसाठी वापरला जात नाही. भुजबळांच्या या विधानावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. रोहिणी आयोग तयार करून ओबीसींचे तुकडे केले. इतकी वर्ष तुमचं सरकार असताना डेटा चुकीचा कसा झाला? गेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारनं डेटा का तयार केला नाही? आपण सगळ्यांनी एकत्रितपणे विनंती करून पंतप्रधानांना इम्पिरिकल डेटा द्यावा ही विनंती करूया. सगळ्या आरक्षणांना भाजपा विरोध करते. मुस्लिमांच्या शैक्षणिक आरक्षणाला विरोध केला. २०२१ ची जनगणना केंद्र सरकारने अद्याप सुरू केली नाही. मग आम्ही ओबीसींची जनगणना कशी करणार? हा डेटा केंद्र सरकारकडून आल्यावर ३ महिन्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवू असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBhaskar Jadhavभास्कर जाधवvidhan sabhaविधानसभा