शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Vidhan Sabha Adhiveshan: सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 13:36 IST

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली.

ठळक मुद्देआशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आला. विधानसभा दालनात तालिका अध्यक्षांना कुठल्याही पद्धतीची धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी दावा केला.तालिका अध्यक्षांवर दबाव टाकणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी अशी शिवसेनेने मागणी केली

मुंबई – विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. ओबीसी आरक्षणावरून विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं चित्र दिसलं. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच सभागृहात ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. विधानसभेचे कामकाज १० मिनिटं स्थगित करण्यात आलं.

विधानसभा दालनात काय झालं?

विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात बोलू दिलं नाही असा आरोप करण्यात आला. यावेळी भास्कर जाधव आणि विरोधी आमदारांची धक्काबुक्की झाली. त्यानंतर आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आला. मात्र विधानसभा कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी तालिका अध्यक्षांवर दबाव टाकणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली. विधानसभेत पुन्हा गोंधळ झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी सभागृहाचं कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी स्थगित केले. मात्र विधानसभा दालनात तालिका अध्यक्षांना कुठल्याही पद्धतीची धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी दावा केला.

विधानसभेत छगन भुजबळ काय म्हणाले?

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पत्र पाठवलं होतं, पंकजा मुंडे, रामदास आठवले यांनीही पत्र पाठवून इम्पिरिकल डेटा देण्याबाबत केंद्र सरकारला कळवलं होतं. १ ऑगस्ट २०१९ ला देवेंद्र फडणवीसांनी पत्र पाठवलं होतं. २०१७ मध्ये कोर्टात याबाबत सुनावणी सुरू असताना २०१९ पर्यंत फडणवीस सरकारने काहीच केले नाही. इम्पिरिकल डेटा उज्ज्वला गॅससाठी वापरला जातो पण ओबीसींसाठी वापरला जात नाही. भुजबळांच्या या विधानावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. रोहिणी आयोग तयार करून ओबीसींचे तुकडे केले. इतकी वर्ष तुमचं सरकार असताना डेटा चुकीचा कसा झाला? गेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारनं डेटा का तयार केला नाही? आपण सगळ्यांनी एकत्रितपणे विनंती करून पंतप्रधानांना इम्पिरिकल डेटा द्यावा ही विनंती करूया. सगळ्या आरक्षणांना भाजपा विरोध करते. मुस्लिमांच्या शैक्षणिक आरक्षणाला विरोध केला. २०२१ ची जनगणना केंद्र सरकारने अद्याप सुरू केली नाही. मग आम्ही ओबीसींची जनगणना कशी करणार? हा डेटा केंद्र सरकारकडून आल्यावर ३ महिन्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवू असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBhaskar Jadhavभास्कर जाधवvidhan sabhaविधानसभा