शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Vidhan Sabha Adhiveshan: महाविकास आघाडी संधी साधणार, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 15:33 IST

Vidhan Sabha Adhiveshan: आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

मुंबई - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद अद्यापही रिक्त आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज आटोपत आहे. मात्र या अधिवेशनात राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे नियोजन केले नव्हते. (Vidhan Sabha Adhiveshan) मात्र आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. (Possibility of special assembly session for election of Maharashtra Assembly Speaker)

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही अडखळत, धडपडत वाटचाल करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.  

विधिमंडलाच्या पावसाठी अधिवेशनात पहिल्या दिवशी सभागृहात गोंधळ घातल्याने तसेच तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याने भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ घटले आहे. याचाही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत सत्ताधाऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र विधानसभा अध्यक्षपदाची निवड जाहीर झाल्यास भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये झालेल्या सत्तास्थानांच्या वाटपात विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तसेच संग्राम थोपटे यांच्यासह इतर नेत्यांची नावे चर्चेत आहेत.   

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपाPoliticsराजकारण