शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Vidhan Sabha Adhiveshan: महाविकास आघाडी संधी साधणार, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 15:33 IST

Vidhan Sabha Adhiveshan: आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

मुंबई - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद अद्यापही रिक्त आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज आटोपत आहे. मात्र या अधिवेशनात राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे नियोजन केले नव्हते. (Vidhan Sabha Adhiveshan) मात्र आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. (Possibility of special assembly session for election of Maharashtra Assembly Speaker)

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही अडखळत, धडपडत वाटचाल करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.  

विधिमंडलाच्या पावसाठी अधिवेशनात पहिल्या दिवशी सभागृहात गोंधळ घातल्याने तसेच तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याने भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ घटले आहे. याचाही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत सत्ताधाऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र विधानसभा अध्यक्षपदाची निवड जाहीर झाल्यास भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये झालेल्या सत्तास्थानांच्या वाटपात विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तसेच संग्राम थोपटे यांच्यासह इतर नेत्यांची नावे चर्चेत आहेत.   

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपाPoliticsराजकारण