शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 13:10 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : स्वतंत्र लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्वतयारी म्हणून मेळावे, उद्घाटनांचा सपाटा

ठळक मुद्देयुती होण्याबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता २०१४ साली शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असल्याचे भाजपकडून भासविण्यात आले.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होण्याबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. समान जागा वाटपाचे गणित जुळेल, अशी शक्यता सध्या तरी दोन्ही पक्षांत नाही. शिवसेना ४० टक्के आणि भाजप ६० टक्के, असे जागावाटपाचे सूत्र सध्या चर्चेत आहे. त्यामुळे युतीचे जागा वाटपातून बिनसले तर दोन्ही पक्षांतील संभाव्य उमेदवारांना निवडणूक मैदानात होणाऱ्या युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

भाजपकडे जिल्ह्यातील नऊ जागांवर उमेदवार तयार आहेत, तर शिवसेनेकडेदेखील जिल्ह्यातील सर्व जागांवर उमेदवार तयार आहेत. त्या तयारीतूनच उद्घाटन आणि भूमिपूजनाचा सपाटा प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. २०१४ साली शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असल्याचे भाजपकडून भासविण्यात आले. शिवसेनेचा मिशन १५० हा नारा त्यावेळी होता. भाजपला तो नारा मान्य नसल्यामुळे ऐनवेळी युती तुटली आणि दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. परिणामी, मराठवाड्यातील ४६ जागांपैकी भाजपला १५, तर शिवसेनेला ११ जागांवर यश आले. जिल्ह्यात भाजपला ३, शिवसेनेला तीन जागांवर यश मिळाले. एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. 

शिवसेनेने शहरातील पूर्व मतदारसंघातून राजू वैद्य, पश्चिममधून आ. संजय शिरसाट, मनोज गांगवे, मध्यमधून माजी आ. प्रदीप जैस्वाल, बंडू ओक, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ यांची मुलाखत घेतली आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संतोष माने, वैजापूरमधून माजी आर.एम. वाणी आणि रमेश बोरनारे यांच्यापैकी एक, कन्नडमधून उदयसिंह राजपूत, केतन काजे, तर सिल्लोडमधून माजी आ. अब्दुल सत्तार, फुलंब्रीतून बाबासाहेब डांगे, जिजा कोरडे आदी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. 

भाजपनेदेखील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. पूर्व मतदारसंघातून राज्यमंत्री अतुल सावे, म्हाडा सभापती संजय केणेकर, मध्यमधून किशनचंद तनवाणी, केणेकर, अनिल मकरिये, पश्चिममधून राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, पंकज भारसाखळे, फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जि.प. सदस्या अनुराधा चव्हाण, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, प्रदीप पाटील, उपमहापौर विजय औताडे, वैजापूरमधून जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परेदशी,  कन्नडमधून संजय खंबायते, किशोर पवार,  गंगापूरमधून आ. प्रशांत बंब, किशोर धनायत, सिल्लोडमधून सुरेश बनकर, सांडू लोखंडे पैठणमधून तुषार पा. शिसोदे, डॉ. सुनील शिंदे अशी इच्छुकांची फौज भाजपकडे आहे.

युती तुटली तर काय ? युती तुटल्यानंतर गंगापूर मतदारसंघात शिवसेनेकडून जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांना मैदानात आणले तर विद्यमान आ. प्रशांत बंब यांच्यासमोरील अडचणी वाढतील. शिवाय भाजपमधूनही आ. बंब यांच्या विरोधात दिलीप बनकर यांनी शड्डू ठोकला आहे. ४पूर्वमध्ये राज्यमंत्री सावे यांना शिवसेनेचे वैद्य नाकीनाऊ आणतील. मध्यमध्ये माजी आ. जैस्वाल हे भाजपचे तनवाणी यांना त्रासदायक ठरतील. सिल्लोडमधून माजी आ. सत्तार यांच्या विजयाचे गणित भाजपच्या बनकर यांच्यामुळे बिघडेल, तर पश्चिममध्ये शिंदे किंवा गायकवाड हे आ. शिरसाट यांना जड जातील.पैठणमध्ये आ. संदीपान भुमरे यांना भाजपचे डॉ. शिंदे, शिसोदे हे रोखतील. फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यासमोर भाजपतून ऐनवेळी आयात होणाऱ्या सेना उमेदवाराचे आव्हान असेल. कन्नडमध्ये माजी आ. हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे राजपूत, भाजपचे खंबायते यांच्यात रस्सीखेच होऊ शकते. वैजापूरमध्ये भाजपने जाधव यांना उमेदवारी दिल्यास सेना भाजपमधूनच तगडा उमेदवार आयात करून आव्हान उभे करील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना