शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 13:10 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : स्वतंत्र लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्वतयारी म्हणून मेळावे, उद्घाटनांचा सपाटा

ठळक मुद्देयुती होण्याबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता २०१४ साली शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असल्याचे भाजपकडून भासविण्यात आले.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होण्याबाबत २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. समान जागा वाटपाचे गणित जुळेल, अशी शक्यता सध्या तरी दोन्ही पक्षांत नाही. शिवसेना ४० टक्के आणि भाजप ६० टक्के, असे जागावाटपाचे सूत्र सध्या चर्चेत आहे. त्यामुळे युतीचे जागा वाटपातून बिनसले तर दोन्ही पक्षांतील संभाव्य उमेदवारांना निवडणूक मैदानात होणाऱ्या युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

भाजपकडे जिल्ह्यातील नऊ जागांवर उमेदवार तयार आहेत, तर शिवसेनेकडेदेखील जिल्ह्यातील सर्व जागांवर उमेदवार तयार आहेत. त्या तयारीतूनच उद्घाटन आणि भूमिपूजनाचा सपाटा प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. २०१४ साली शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असल्याचे भाजपकडून भासविण्यात आले. शिवसेनेचा मिशन १५० हा नारा त्यावेळी होता. भाजपला तो नारा मान्य नसल्यामुळे ऐनवेळी युती तुटली आणि दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. परिणामी, मराठवाड्यातील ४६ जागांपैकी भाजपला १५, तर शिवसेनेला ११ जागांवर यश आले. जिल्ह्यात भाजपला ३, शिवसेनेला तीन जागांवर यश मिळाले. एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. 

शिवसेनेने शहरातील पूर्व मतदारसंघातून राजू वैद्य, पश्चिममधून आ. संजय शिरसाट, मनोज गांगवे, मध्यमधून माजी आ. प्रदीप जैस्वाल, बंडू ओक, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ यांची मुलाखत घेतली आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संतोष माने, वैजापूरमधून माजी आर.एम. वाणी आणि रमेश बोरनारे यांच्यापैकी एक, कन्नडमधून उदयसिंह राजपूत, केतन काजे, तर सिल्लोडमधून माजी आ. अब्दुल सत्तार, फुलंब्रीतून बाबासाहेब डांगे, जिजा कोरडे आदी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. 

भाजपनेदेखील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. पूर्व मतदारसंघातून राज्यमंत्री अतुल सावे, म्हाडा सभापती संजय केणेकर, मध्यमधून किशनचंद तनवाणी, केणेकर, अनिल मकरिये, पश्चिममधून राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, पंकज भारसाखळे, फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जि.प. सदस्या अनुराधा चव्हाण, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, प्रदीप पाटील, उपमहापौर विजय औताडे, वैजापूरमधून जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परेदशी,  कन्नडमधून संजय खंबायते, किशोर पवार,  गंगापूरमधून आ. प्रशांत बंब, किशोर धनायत, सिल्लोडमधून सुरेश बनकर, सांडू लोखंडे पैठणमधून तुषार पा. शिसोदे, डॉ. सुनील शिंदे अशी इच्छुकांची फौज भाजपकडे आहे.

युती तुटली तर काय ? युती तुटल्यानंतर गंगापूर मतदारसंघात शिवसेनेकडून जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांना मैदानात आणले तर विद्यमान आ. प्रशांत बंब यांच्यासमोरील अडचणी वाढतील. शिवाय भाजपमधूनही आ. बंब यांच्या विरोधात दिलीप बनकर यांनी शड्डू ठोकला आहे. ४पूर्वमध्ये राज्यमंत्री सावे यांना शिवसेनेचे वैद्य नाकीनाऊ आणतील. मध्यमध्ये माजी आ. जैस्वाल हे भाजपचे तनवाणी यांना त्रासदायक ठरतील. सिल्लोडमधून माजी आ. सत्तार यांच्या विजयाचे गणित भाजपच्या बनकर यांच्यामुळे बिघडेल, तर पश्चिममध्ये शिंदे किंवा गायकवाड हे आ. शिरसाट यांना जड जातील.पैठणमध्ये आ. संदीपान भुमरे यांना भाजपचे डॉ. शिंदे, शिसोदे हे रोखतील. फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यासमोर भाजपतून ऐनवेळी आयात होणाऱ्या सेना उमेदवाराचे आव्हान असेल. कन्नडमध्ये माजी आ. हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे राजपूत, भाजपचे खंबायते यांच्यात रस्सीखेच होऊ शकते. वैजापूरमध्ये भाजपने जाधव यांना उमेदवारी दिल्यास सेना भाजपमधूनच तगडा उमेदवार आयात करून आव्हान उभे करील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना