शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

Video: बिहारचा नेता कोण? काँग्रेस आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी; चोर म्हटल्याने निमित्त झाले

By हेमंत बावकर | Updated: November 13, 2020 17:33 IST

Bihar Assembly Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसत नाही तोच अवघ्या 19 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये नेता कोण बनणार यावरून तुंबळ हाणामारी पहायला मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे आमदारांमध्येच हा राडा झाला आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे. तर दुसरीकडे राजदने एनडीएतील मित्रपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोर लावला आहे. अशातच काँग्रेसनेही आज नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली होती. 

काँग्रेस आमदारांच्या या बैठकीत शुक्रवारी मोठा राडा झाला. बैठकीमध्ये आमदार विजय शंकर दुबे यांना चोर म्हटल्याने मोठा गोंधळ उडाला होता. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सदाकत आश्रममध्ये या नव्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी दोन गटांत मोठा राडा झाला आणि शिवीगाळही करण्य़ात आली. 

महाराजगंजहून आमदार विजय शंकर दुबे आणि विक्रमचे आमदार सिद्धार्थ यांच्यामध्ये काँग्रेसच्या गटनेता कोण होणार यावरून बाचाबाची झाली. यावेळी सिद्धार्थ गटाच्या आमदारांनी दुबेंना चोर म्हटले. यामुळे संतापलेल्या झालेल्या दुबे गटाने थेट हाणामारीला सुरुवात केली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. 

यानंतर नेत्यांमध्ये राडा झाल्याचे कळताच बाहेर उभे असलेल्या कार्यकर्त्यांनीही बैठकीकडे धाव घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

"आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं; पुन्हा मतमोजणी करा", तेजस्वी यादवांची मागणी बिहारनिवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले आहे. तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली आहे. 

"जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. 2015 मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमार