शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Video: “...तर माझं नाव बदलून टाका”; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 11:38 IST

Pandharpur By Elections: या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

ठळक मुद्देदेशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होतायेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. ही अवस्था या सरकारने करून ठेवली आहेलोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही.

पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे. यात कोणाला यश मिळणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.(BJP Devendra Fadnavis Target Thackeray government over Lockdown in Maharashtra)  

परंतु या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणूक ही जनतेसाठी एक संधी आहे. लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. पोलिसांकडून, शेतकऱ्यांकडून, जनतेकडून वसुली करण्यासाठी सरकार काम करतंय. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होतायेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. ही अवस्था या सरकारने करून ठेवली आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. हे आवश्यक असलं तरी जेव्हा लॉकडाऊन करतो तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य माणसांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही. सरकारला मायबाप का म्हणतो कारण त्यांनी अडचणीत असलेल्या मुलांना मदत केली पाहिजे. सरकारनं मदत केलीच नाही पण वीजबिलाची वसुली मुघलांप्रमाणे केली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

दरम्यान, निवडणूक असल्यामुळे पंढरपूर परिसरात वीज कनेक्शन कापण्यात येत नाही. परंतु १७ तारखेनंतर जर पंढरपूर मतदारसंघात सरकारने वीज कनेक्शन कापलं नाही तर माझं नाव बदलून टाका. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपाने गदारोळ केल्यानंतर वीज कनेक्शन कापणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर शेवटच्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यावरील स्थगिती उठवली. हे सरकार लबाड आहे. सरकारने बिल्डरांना ५ हजार कोटींची सूट दिली परंतु शेतकऱ्यांकडून ५ हजार कोटींची वसुली सरकारने केली. अजितदादा खूप काही बोलतील पण हे लबाडांचे अवसान घेतायेत. सरकारने एक नवा पैसा पंढरपूरला दिला नाही. भाजपा सरकारच्या काळात दुप्पटीने सोलापूर जिल्ह्याला पैसा दिला असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभेत केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाpandharpur-acपंढरपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021