शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Video: “...तर माझं नाव बदलून टाका”; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 11:38 IST

Pandharpur By Elections: या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

ठळक मुद्देदेशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होतायेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. ही अवस्था या सरकारने करून ठेवली आहेलोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही.

पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे. यात कोणाला यश मिळणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.(BJP Devendra Fadnavis Target Thackeray government over Lockdown in Maharashtra)  

परंतु या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणूक ही जनतेसाठी एक संधी आहे. लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. पोलिसांकडून, शेतकऱ्यांकडून, जनतेकडून वसुली करण्यासाठी सरकार काम करतंय. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होतायेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. ही अवस्था या सरकारने करून ठेवली आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. हे आवश्यक असलं तरी जेव्हा लॉकडाऊन करतो तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य माणसांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही. सरकारला मायबाप का म्हणतो कारण त्यांनी अडचणीत असलेल्या मुलांना मदत केली पाहिजे. सरकारनं मदत केलीच नाही पण वीजबिलाची वसुली मुघलांप्रमाणे केली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

दरम्यान, निवडणूक असल्यामुळे पंढरपूर परिसरात वीज कनेक्शन कापण्यात येत नाही. परंतु १७ तारखेनंतर जर पंढरपूर मतदारसंघात सरकारने वीज कनेक्शन कापलं नाही तर माझं नाव बदलून टाका. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपाने गदारोळ केल्यानंतर वीज कनेक्शन कापणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर शेवटच्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यावरील स्थगिती उठवली. हे सरकार लबाड आहे. सरकारने बिल्डरांना ५ हजार कोटींची सूट दिली परंतु शेतकऱ्यांकडून ५ हजार कोटींची वसुली सरकारने केली. अजितदादा खूप काही बोलतील पण हे लबाडांचे अवसान घेतायेत. सरकारने एक नवा पैसा पंढरपूरला दिला नाही. भाजपा सरकारच्या काळात दुप्पटीने सोलापूर जिल्ह्याला पैसा दिला असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभेत केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाpandharpur-acपंढरपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021