शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 03:53 IST

यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती.

- एन. के. सिंहलखनऊ : यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती. या वेळी तसेच घडणार की समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोक दल यांची आघाडी भाजपला चितपट करेल, यावर केंद्रातील सत्तेची गणिते ठरणार आहेत.अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर ११ महिन्यांनी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या वेळी उत्तर प्रदेशसह देशभर हिंदुत्वाचे वातावरण होते. अशा स्थितीत सप व बसप यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या होत्या. त्या वेळी सप-बसप आघाडीला १७६ जागा (सपला ११0 व बसपला ६७) मिळाल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी २१३ जागांची गरज होती. भाजपला १७६ जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी सपला २१.८0 टक्के तर बसपला १९.६४ टक्के मते मिळाली होती. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत दोघांच्या मतांमध्ये मिळून १२ टक्क्यांची वाढ दिसली होती. भाजपला मिळालेली मते ३२.५२ टक्के इतकी होती.त्याच सप-बसपची आता आघाडी आहे. त्यात रालोदही सहभागी आहे. त्यानंतर २0१४ च्या लोकसभा व २0१७ सालच्या विधानसभा निवडणुकांत या दोन पक्षांना मिळालेली मते पाहिली तर ती भाजपच्या आसपास वा त्याहून अधिकच आहेत. हे गणित लक्षात घेतले, तर यंदा उत्तर प्रदेशात भाजपला ५0 जागांचे नुकसान होऊ शकते. म्हणजेच २0१४ पेक्षा ५0 जागा कमी मिळू शकतात. हा फॉर्म्युला यशस्वी झाला, तर अन्य राज्यांतील प्रादेशिक पक्षही त्याची पुनरावृत्ती करू शकतील.भाजप सत्तेवर आल्यानंतर गाय, बैल, भारतमाता यांच्या नावाने अल्पसंख्याक, दलित व मागास जातींमध्ये भीतीची भावना निर्माण करण्यात आली. दलितांना लग्नाची वरात आपल्या घरासमोरून काढू नये, असे उच्च जातींच्या मंडळींनी बजावल्याचीही काही उदाहरणे आहेत.एके ठिकाणी घोडीवर दलित वर बसल्याने संतापून उच्च जातींतील एकाने त्याच्यावर बंदूकच रोखली होती. त्यामुळे या जाती भाजपवर नाराज आहेत. भाजप आपले आरक्षण पूर्णपणे रद्द करेल, अशीही भीती मागास जातींमध्ये आहे. त्यामुळे या जाती सप-बसपच्या मागे उभ्या दिसत आहेत. केवळ मतांची टक्केवारीच नव्हे, तर जे रसायन तयार झाले आहे, तेही भाजपच्या विरोधात दिसत आहे. आपल्याकडे फर्स्ट पास्ट द पोस्ट नावाचा एक खेळ आहे. त्यात खांबापाशी जो आधी पोहोचतो, तोच जिंकतो. निवडणुकीच्या खेळात मात्र दोन अधिक दोन म्हणजे चारच नव्हे, तर आठही होऊ शकतात.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)>सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपले वडील मुलायमसिंह व बसपच्या प्रमुख मायावती यांच्यातील २५ वर्षांपासूनचे वैर संपवून दाखवले आहे. त्यांच्यातील हा समझोता निवडणूक निकालांत त्यांना फायदा मिळवून देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.दोन प्रादेशिक पक्षांतील हा समझोताच मुळी देशातील राजकारणातील नवा व वेगळा प्रयोग आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी