शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 16:59 IST

केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही", असं फडणवीस म्हणाले आहेत. 

मुंबईविधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ व १५ डिसेंबर रोजी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. ''केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही", असं फडणवीस म्हणाले आहेत. 

"विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकललं गेलं, पण त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे केवळ दोन दिवसांचं अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. आमचा सातत्याने आग्रह होता की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट आहे. पहिल्यांदा पावसाने, अतिवृष्टीने, पुराने चक्रीवादळाने आणि रोगराईने शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे. कापूस, सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिलांवरील अत्याचारांच प्रमाणही वाढलं आहे. या अनेक प्रश्नांवरील चर्चेसाठी विधानभवन हे महत्वाचं स्थान असताना दोन दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे", अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

राज्यात अनलॉक होत असताना विधानसभेच्या अधिवेशनावर बंधन का?राज्यात आपण सर्व अनलॉक करण्याची भूमिका घेतली आहे. जवळपास सर्व गोष्टी आता सुरू झाल्या आहेत. असं असताना विधानसभेच्या अधिवेशनावरच बंधन का?, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळ असल्याने किमान दोन आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं अशी आम्ही मागणी केली होती पण ती मान्य न करता केवळ दोन दिवसांचं अधिवेशन बोलविण्यात आलं आहे. यातून सरकारचा चर्चेपासून पळ काढण्याचा उद्देश लक्षात येतो, असंही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपा