शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसीत राजकीय भूकंप; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली

By प्रविण मरगळे | Published: December 18, 2020 12:21 PM

राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी टीएमसी खासदार सुनील मंडल यांच्या घरी भेट दिली, येथे टीएमसीच्या नाराज असलेल्या नेत्यांची बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे.

ठळक मुद्देअधिकारी यांच्याआधी टीएमसीचे आमदार आणि आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप लावलेममता बॅनर्जी यांच्यानंतर सुवेंद्रु अधिकारी हे लोकप्रिय नेते होते हे नाकारू शकत नाहीगुरुवारी अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर टीएमसीच्या आणखी एका आमदाराने पक्षाचा राजीनामा दिला आहे.

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक बडे नेते पक्षाला रामराम करत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिंता वाढली आहे. टीएमसीच्या प्रमुख नेत्यांची ममता बॅनर्जी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. गुरूवारी पक्षाचे सुवेंद्रु अधिकारी यांनी नाट्यमयरित्या राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. अधिकारी शनिवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मात्र टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, ही तातडीची बैठक नसून पक्षाची नियमित बैठक आहे. यात पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी टीएमसी नेत्यांची चर्चा करणार आहे. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. मात्र त्याआधीच सत्ताधारी टीएमसीत भगदाड पडत असल्याचं चित्र आहे. पक्षातील मोठ्या नेत्यांपासून स्थानिक पातळीवरील नेते बंडखोरी करून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. ममता बॅनर्जी यांच्या जवळचे सहकारी सुवेंद्रु अधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी टीएमसी खासदार सुनील मंडल यांच्या घरी भेट दिली, येथे टीएमसीच्या नाराज असलेल्या नेत्यांची बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे. अधिकारी यांच्याआधी टीएमसीचे आमदार आणि आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप लावले, त्यांनी मंत्री यांना पत्र पाठवत राज्यातील सरकार राजकीय कारणामुळे त्यांच्या शहराला मिळणारा केंद्राचा निधी स्वीकारत नाहीत, जो आमच्यावरील अन्याय आहे असा आरोप त्यांनी केला. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर तिवारी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्यानंतर सुवेंद्रु अधिकारी हे लोकप्रिय नेते होते हे नाकारू शकत नाही, पक्षाने त्यांच्यासोबत चर्चा करून समस्येवर तोडगा काढायला हवा होता पण पक्षाला माझ्यासारख्या छोट्या नेत्यांपासून मोठ्या नेत्यांचीही मनधरणी करण्याची गरज वाटत नाही असं तिवारींनी सांगितले.

ममता बॅनर्जींचा पलटवार

बंडखोर नेते पक्षाला रामराम करत असताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काही लोक जिथे वारं वाहतं त्याठिकाणी जातात पण जे खरे तृणमूल काँग्रेसची आहेत ते पक्षातच आहेत. भाजपा निर्लज्जपणे टीएमसीच्या नेत्यांची शॉपिंग करत आहे, हे कोणत्याप्रकारचं राजकारण आहे? तर दुसरीकडे टीएमसी नेते म्हणतात की, जे नेते पक्ष सोडत आहेत त्यांना विधानसभेत उमेदवारी मिळणार नाही याची भनक लागली आहे. तर कोळसा आणि गो तस्करी प्रकरणात चौकशी करण्याच्या केंद्रीय संस्थेच्या दबावापोटी अनेक नेते पक्ष सोडत असल्याचंही सांगितले जात आहे.

गुरुवारी अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर टीएमसीच्या आणखी एका आमदाराने पक्षाचा राजीनामा दिला आहे. शीलभद्र दत्ता हे २४ परगना जिल्ह्यातील बैरकपूर येथून आमदार आहेत. शीलभद्र दत्ता यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राजीनामा सोपवला आहे. प्रशांत किशोर यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला. प्रशांत किशोर ज्यापद्धतीने काम करत आहेत, ते मार्केटिंग कंपनीसारखं वाटतं, अशा स्थितीत काम करू शकत नाही असं शीलभद्र दत्त यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक