शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

“शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं; २ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 15:47 IST

BJP Sudhir Mungantiwar Target Thackeray Government: १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला.

ठळक मुद्देजनहितविरोधी सरकारला अधिवेशन घ्यायचं नाही, जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालंएखादा प्रश्न उपस्थित केला तर मोहन डेलकरांची आत्महत्या सांगायचीस्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, पण आमच्या लक्षातच आलं नाही की अशाप्रकारे बेईमानी होऊ शकते

मुंबई – राज्यातील सत्तापालट निश्चित असून जनहितविरोधी सरकार टिकवणं ही सर्वात मोठी घोडचूक आहे असं विधान भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार(BJP Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुनगंटीवारांनी राज्यात ३ महिन्याने सत्तांतर होण्याचा दावा केला होता. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Shivsena MP Sanjay Raut) यांनी मुनगंटीवारांना टोला लगावला होता.

त्यानंतर आता पुन्हा सुधीर मुनगंटीवारांनी पुनरुच्चार केला आहे की, शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं, जनहितविरोधी सरकारला अधिवेशन घ्यायचं नाही, जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालं, यावेळी ४७ तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्रासमोर तयार झाले, १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला.

तसेच एखादा प्रश्न उपस्थित केला तर मोहन डेलकरांची आत्महत्या सांगायची, आश्चर्य वाटतं, वीजबिलावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही, सरकारी इमारतीत जे भाडेकरू आहेत त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे असं सरकार टिकवणं हे सुद्धा राजकीय दृष्टीने आमच्या हातून सर्वात मोठी घोडचूक आहे, तीन महिन्याचे चार महिने होतील पण हे सरकार टिकवणं घोडचूक आहे. जनतेने महाविकास आघाडी सरकारला निवडून दिलं नाही, जनतेने भाजपा शिवसेनेचे(BJP-Shivsena) १६१ आमदार निवडून दिले. बेईमानी केली, काँग्रेस-राष्ट्रवादीचे(Congress-NCP) ९८ आमदार आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, पण आमच्या लक्षातच आलं नाही की अशाप्रकारे बेईमानी होऊ शकते अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही, जनहितविरोधी राजकारण होत असेल तर शक्तीने लढावं लागेल, तत्परतेने पुढे जावं लागेलच, सूडाचं राजकारण वाढतं तेव्हा सत्तेचा प्रलय नक्कीच होतो, पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राती सरकारच्या चूकांचे वजन भरलंय असं समजून चाला, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी २ मेनंतर महाराष्ट्रात राजकीय उलाथापालथ होण्याचा दावा केला आहे.

सरसंघचालकांसोबत भेट अराजकीय

देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती, परंतु संघचालकाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा दूरान्वये संबंध नाही, संघ देशभक्तीसाठी प्रेरित काम करत असते, त्यांना सगळेच सारखेच आहेत. उत्तम देशभक्त नागरिक निर्माण करण्याचं काम ते करतात. जे देशहिताचं करतात, मग ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल त्यांना सगळेच प्रिय आहेत असंही मुनगंटीवारांनी म्हटलं आहे.

सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात – खासदार संजय राऊत

सरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणारच, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत सरकार अतिशय मजबूत आहे. सरकारचं कामकाज योग्य दिशेनं सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी पुढील साडे तीन वर्ष त्यांचं काम करत राहावं. सरकारची चिंता सुधीर मुनगंटीवार यांनी करू नये, असा टोला लगावला. त्याचसोबत लॉकडाऊनमध्ये लागू असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. काही निर्मात्यांनी मला मदतीसाठी फोन केले होते. पण मुनगंटीवारांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा चिमटा त्यांनी काढला.  

 

टॅग्स :BJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस