शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

“शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं; २ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 15:47 IST

BJP Sudhir Mungantiwar Target Thackeray Government: १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला.

ठळक मुद्देजनहितविरोधी सरकारला अधिवेशन घ्यायचं नाही, जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालंएखादा प्रश्न उपस्थित केला तर मोहन डेलकरांची आत्महत्या सांगायचीस्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, पण आमच्या लक्षातच आलं नाही की अशाप्रकारे बेईमानी होऊ शकते

मुंबई – राज्यातील सत्तापालट निश्चित असून जनहितविरोधी सरकार टिकवणं ही सर्वात मोठी घोडचूक आहे असं विधान भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार(BJP Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुनगंटीवारांनी राज्यात ३ महिन्याने सत्तांतर होण्याचा दावा केला होता. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Shivsena MP Sanjay Raut) यांनी मुनगंटीवारांना टोला लगावला होता.

त्यानंतर आता पुन्हा सुधीर मुनगंटीवारांनी पुनरुच्चार केला आहे की, शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं, जनहितविरोधी सरकारला अधिवेशन घ्यायचं नाही, जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालं, यावेळी ४७ तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्रासमोर तयार झाले, १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला.

तसेच एखादा प्रश्न उपस्थित केला तर मोहन डेलकरांची आत्महत्या सांगायची, आश्चर्य वाटतं, वीजबिलावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही, सरकारी इमारतीत जे भाडेकरू आहेत त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे असं सरकार टिकवणं हे सुद्धा राजकीय दृष्टीने आमच्या हातून सर्वात मोठी घोडचूक आहे, तीन महिन्याचे चार महिने होतील पण हे सरकार टिकवणं घोडचूक आहे. जनतेने महाविकास आघाडी सरकारला निवडून दिलं नाही, जनतेने भाजपा शिवसेनेचे(BJP-Shivsena) १६१ आमदार निवडून दिले. बेईमानी केली, काँग्रेस-राष्ट्रवादीचे(Congress-NCP) ९८ आमदार आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, पण आमच्या लक्षातच आलं नाही की अशाप्रकारे बेईमानी होऊ शकते अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही, जनहितविरोधी राजकारण होत असेल तर शक्तीने लढावं लागेल, तत्परतेने पुढे जावं लागेलच, सूडाचं राजकारण वाढतं तेव्हा सत्तेचा प्रलय नक्कीच होतो, पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राती सरकारच्या चूकांचे वजन भरलंय असं समजून चाला, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी २ मेनंतर महाराष्ट्रात राजकीय उलाथापालथ होण्याचा दावा केला आहे.

सरसंघचालकांसोबत भेट अराजकीय

देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती, परंतु संघचालकाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा दूरान्वये संबंध नाही, संघ देशभक्तीसाठी प्रेरित काम करत असते, त्यांना सगळेच सारखेच आहेत. उत्तम देशभक्त नागरिक निर्माण करण्याचं काम ते करतात. जे देशहिताचं करतात, मग ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल त्यांना सगळेच प्रिय आहेत असंही मुनगंटीवारांनी म्हटलं आहे.

सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात – खासदार संजय राऊत

सरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणारच, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत सरकार अतिशय मजबूत आहे. सरकारचं कामकाज योग्य दिशेनं सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी पुढील साडे तीन वर्ष त्यांचं काम करत राहावं. सरकारची चिंता सुधीर मुनगंटीवार यांनी करू नये, असा टोला लगावला. त्याचसोबत लॉकडाऊनमध्ये लागू असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. काही निर्मात्यांनी मला मदतीसाठी फोन केले होते. पण मुनगंटीवारांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा चिमटा त्यांनी काढला.  

 

टॅग्स :BJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस