शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

लोकसभेसोबत विधानसभा नाहीच, मुख्यमंत्र्यांचा ठाम इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:25 IST

केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलेले पॅकेज, यांमुळे महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याच्या चर्चेला गुरुवारी उधाण आले.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले डझनभर निर्णय, नागपूर मेट्रोसह विविध कामांच्या उद्घाटनाची सुरू असलेली घाई व केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलेले पॅकेज, यांमुळे महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याच्या चर्चेला गुरुवारी उधाण आले. पण ‘लिहून घ्या, मुदतपूर्व निवडणूक होत नाही’ अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणूक लोकसभेसह घेण्याचा निर्णय दिल्लीत भाजपा नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाची शुक्रवारी जी बैठक होईत, तिच्यात विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतला जाईल, असे वृत्त पसरले. दिल्लीत तशी बैठक झाली नाही. मात्र शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती; पण भाजपाने ती अमान्य केली. एकत्रित निवडणूक घेतली तर भाजपामध्ये विधानसभेला मोठी बंडखोरी होईल, अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या किमान ४० मतदारसंघांत भाजपाचे बंडखोर उभे ठाकतील, असे दिसते. त्यामुळेही भाजपाला एकत्रित निवडणूक नको असल्याचे कळते. दोन्ही निवडणुकांसाठी युतीत जागावाटप फॉर्म्युला ठरला असला तरी अनेकांना वाटते की ही युती विधानसभेपर्यंत टिकणार नाही. भाजपाचे १२२ आमदार असताना तो १४४ जागांवर समाधान कसे मानेल? चार अपक्ष आमदार भाजपातर्फे लढू इच्छितात. भाजपाला मित्रपक्षास दहा जागा द्याव्या लागतील. म्हणजे नव्याने लढण्यासाठी भाजपाकडे दहाही जागा शिल्लक नसतील.का नको मध्यावधी ?मुदतपूर्व निवडणूक घ्यायची तर राज्य सरकार अधिकारहीन होईल. हाती सत्ता असताना लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणे सोयीचे असते. आधी लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक घेतल्यास आमदारकीचे इच्छुक नेते लोकसभेसाठी ताकद लावतील. निवडणूक एकत्र झाल्यास नेते-कार्यकर्तेही विभागले जातात.राज्यात दुष्काळ असताना विधानसभेची निवडणूक सहा महिने आधी घेतल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. निवडणुकांची तयारी एक महिना आधी करून, निवडणूक आयोगाला कळवावे लागते. आता तेवढी वेळ नाही.>मुदतपूर्वचा प्रयोग अंगलटलोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा प्रयोग १९९९ मध्ये युतीच्या अंगलट आला होता. सहा महिने आधी विधानसभा बरखास्त करून एकत्रित निवडणूक घेतली गेली. केंद्रात भाजपाची सत्ता आली, पण राज्यात ती गमवावी लागली होती.>लोकसभेसोबत महाराष्टÑ विधानसभेची निवडणूक होणार नाही. यासंदर्भातील चर्चा निराधार आहे. मुदतपूर्व निवडणूक होणारनाही हे लिहून घ्या. - देवेंद्र फडणवीस

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९vidhan sabhaविधानसभा