शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

ठाकरे स्वत:च्या सोयीने हिंदुत्व वापरतात, चंद्रकांत पाटील यांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:26 IST

Chandrakant Patil News : तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमचं हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलते असे पाटील हे ठाकरेंना उद्देशून म्हणाले.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:च्या सोईने हिंदुत्व वापरतात. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी हिंदुत्वाची व्याख्याच बदलल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे  यांच्या भाषणावर दिली.ते म्हणाले की, ठाकरे हे बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे विसरले आहेत.  सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केलं, ‘’’’हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’’’’, हे मुळात तुमच्यासाठी होतं. हिंदुत्वाचा वापर करून आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरु आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमचं हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलते असे पाटील हे ठाकरेंना उद्देशून म्हणाले. कोरोनाबाबत भाषणात चिडीचूप बसलात, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलला नाहीत. केवळ भाषणबाजी करून काहीही होणार नाही, असे पाटील म्हणाले. 

अभिनेता सुशांतसिंहची हत्याच; आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल  अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नव्हती, ती हत्याच होती आणि या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी सोमवारी पत्र परिषदेत केला. ‘उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपविरुद्ध बोलले. यापुढे ते तसे बोलले तर मातोश्रीवरील आतलेबाहेरचे सगळेच बाहेर काढू’ असा इशाराही राणे यांनी दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांचा पूर्णवेळ एकेरीत उल्लेख करत राणे पत्रपरिषदेत म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहेच. आज जे मी बोलतोय ते सीबीआय पाहतच असेल त्यांनी बोलावले तर मी, माझी मुले त्या बाबतची माहिती देऊ. स्वत:च्या मुलाला क्लीन चिट देण्याचा ठाकरेंना काय अधिकार? पोलिसांचा वापर करून ते मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ३९ वर्षे मी शिवसेनेत होतो, मला खूप काही माहिती आहे. उद्या बोललो ना तर पळता भुई थोडी होईल. आमच्याकडे नजर फिरवू नका. कालच्या भाषणात बेडूक वगैरे बोललात, बेडूक तरी एका दिशेने जाते. तुम्ही हिंदुत्वाला मूठमाती देत सेक्युलर होणारे आणि पुन्हा हिंदुत्व सोडले नसल्याचे सांगणारे दोन तोंडी गांडूळ आहात, असा हल्लाबोलही राणे यांनी केला. उद्धव हे मराठा समाजाचा द्वेष करणारे आहेत, ते या समाजाला कधीही आरक्षण देणार नाहीत, असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव यांनी बाळासाहेबांना छळलं. दादरमधील शिवसेना भवनचे उद्घाटन दसऱ्याला करून त्याच ठिकाणी गडकरी चौकात दसरा मेळावा घ्यावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती, ती डावलून त्यांनी शिवाजी पार्कवरच मेळावा घेतला, तेव्हा बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले होते? असा दावाही राणे यांनी केला. ‘पुढची २५ वर्षे शिवसेना सत्तेत राहील’, असे म्हणताना संजय राऊत कोणत्या धुंदीत होते? असा सवाल राणे यांनी केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना