शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: “पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:16 IST

तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले तरी अद्याप ठोस मदत झालेली नाही. याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देअनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत भाजपा नेते निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे

मुंबई – राज्यात आलेल्या तौक्त वादळाच्या नुकसान भरपाईवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात सर्वाधिक कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घराचे पत्रे उडाले. घरातील नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून या सर्व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यासह अधिकारी दाखल झाले होते.(BJP Nilesh Rane Target CM Uddhav Thackeray over Tauktae Cyclone relief issue)

तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले तरी अद्याप ठोस मदत झालेली नाही. याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, अजून एक पोकळ आश्वासन...पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत असा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. तोच निकष या ठिकाणीही असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळातं झालं प्रचंड नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात ६९५ गावांना फटका बसला. २,५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २६,३५८ नागरिकांना फटका बसला. १२६ शाळा, महाविद्यालये, शासकीय इमारतींचे नुकसान झाले. ७९० झाडे पडली. १६२६ वीजखांब पडले. ४,३५९ घरांचे अंशत: तर ११ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. दोघांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात १८२० गावांमध्ये फटका बसला. १५५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २७,७९८ नागरिकांना फटका बसला. ११,३९१ घरांचे नुकसान झाले. शासकीय इमारती, शाळा महाविद्यालयांच्या १३५३ इमारतींचे अंशत: नुकसान झाले. विजेचे १०३२ खांब पडले. चार जणांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६४० गावांना फटका बसला. ६,६५२ घरांचे अंशत: तर २३ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. ३,३७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानझाले. १५,६४४ नागरिकांना फटका बसला. २२५ शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालयांचे नुकसान झाले. २१ हजार ८९० झाडे पडली. १२८१ वीजखांब पडले. तिघांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ