शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: “पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:16 IST

तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले तरी अद्याप ठोस मदत झालेली नाही. याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देअनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत भाजपा नेते निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे

मुंबई – राज्यात आलेल्या तौक्त वादळाच्या नुकसान भरपाईवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात सर्वाधिक कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घराचे पत्रे उडाले. घरातील नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून या सर्व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यासह अधिकारी दाखल झाले होते.(BJP Nilesh Rane Target CM Uddhav Thackeray over Tauktae Cyclone relief issue)

तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले तरी अद्याप ठोस मदत झालेली नाही. याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, अजून एक पोकळ आश्वासन...पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत असा घणाघात त्यांनी सरकारवर केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषांच्या बाहेर जाऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्यात आली होती. तोच निकष या ठिकाणीही असेल. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळातं झालं प्रचंड नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात ६९५ गावांना फटका बसला. २,५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २६,३५८ नागरिकांना फटका बसला. १२६ शाळा, महाविद्यालये, शासकीय इमारतींचे नुकसान झाले. ७९० झाडे पडली. १६२६ वीजखांब पडले. ४,३५९ घरांचे अंशत: तर ११ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. दोघांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात १८२० गावांमध्ये फटका बसला. १५५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २७,७९८ नागरिकांना फटका बसला. ११,३९१ घरांचे नुकसान झाले. शासकीय इमारती, शाळा महाविद्यालयांच्या १३५३ इमारतींचे अंशत: नुकसान झाले. विजेचे १०३२ खांब पडले. चार जणांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६४० गावांना फटका बसला. ६,६५२ घरांचे अंशत: तर २३ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. ३,३७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानझाले. १५,६४४ नागरिकांना फटका बसला. २२५ शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालयांचे नुकसान झाले. २१ हजार ८९० झाडे पडली. १२८१ वीजखांब पडले. तिघांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ