शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

“एवढी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने दडवून का ठेवली?; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By प्रविण मरगळे | Updated: October 4, 2020 16:13 IST

Sushant Singh Rajput, BJP MLA Ram Kadam News: संपूर्ण देशाच्या युवा पिढीच्या दृष्टीकोनातून ड्रग्स हा विषय अंत्यत गंभीर आहे तो महाराष्ट्र सरकारच्या नजरेतून सुटला? का मुद्दामून त्याकडे दुर्लक्ष केले? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देया प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याच्या कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही६५ दिवसांमध्ये कोणाची अटक नाही किंबहुना ड्रग्सचा विषय समोर आला नाही हा दाबण्याचा प्रयत्न का केला? सरकारच्या मंत्र्याचा पवित्रा या प्रकरणात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा आहे हे दुर्देव आहे.

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील कुरघोडी संपण्याची चिन्हे दिसत नाही. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव असून कोणाला तरी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करतंय असा भाजपा नेत्यांनी केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र या संपूर्ण प्रकरणावरुन भाजपाने ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते.

आता या प्रकरणात भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलंय की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे ६५ दिवस होता. या काळात रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधील ड्रग्स संदर्भातील गंभीर व्हॉट्सअप चॅट उपलब्ध असतात महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय होतं? ६५ दिवसांमध्ये एकालाही अटक केली नाही, संपूर्ण देशाच्या युवा पिढीच्या दृष्टीकोनातून ड्रग्स हा विषय अंत्यत गंभीर आहे तो महाराष्ट्र सरकारच्या नजरेतून सुटला? का मुद्दामून त्याकडे दुर्लक्ष केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तर या प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याच्या कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही, अशी देशातील कोट्यवधी जनतेची मानसिकता आहे. म्हणूनच ६५ दिवसांमध्ये कोणाची अटक नाही किंबहुना ड्रग्सचा विषय समोर आला नाही हा दाबण्याचा प्रयत्न का केला? ६५ दिवसांनी हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे गेल्यानंतर ड्रग्स प्रकरणात १९ पेक्षा अधिक जणांना तुरुंगात जावं लागले. रिया चक्रवर्तीचे प्रवक्ता म्हणून सरकारचे नेते आणि सरकार वागत होते तिलाही तुरुंगात जावं लागतं हे सर्व देशाने पाहिलं असा टोला राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या संशयास्पद वागण्यामुळे शौर्यची परंपरा असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा दुस्साहस कुकर्म किंबहुना पाप महाराष्ट्र सरकारच्य हातून घडलं हे नाकारता येणार नाही. एवढी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने का दडवून ठेवली? सरकारच्या मंत्र्याचा पवित्रा या प्रकरणात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा आहे हे दुर्देव आहे. ड्रग्सचा विषय दाबला की, नजरेतून सुटला हे प्रश्न अनुत्तरीत आहे. महाराष्ट्र सरकारला मुंबई पोलिसांची माफी मागत याची उत्तर द्यावी लागतील असंही आमदार राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

राष्ट्रवादी आमदारांनी भाजपा नेत्यांवर केली होती टीका

सुशांत सिंह प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्या आहे असं एम्सने सीबीआयला रिपोर्ट दिल्याचं सांगितलं गेलं, त्यानंतर सत्ताधारी नेते आक्रमक झाले, याप्रकरणी आमदार रोहित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला होता. सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.आता CBIने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं तर  बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फिरलंय, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी असं रोहित पवार म्हणाले होते.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRam Kadamराम कदमNCPराष्ट्रवादी काँग्रेसAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरे