शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 04:51 IST

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा ...

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा अभिमान म्हणून या पक्षाकडे बघितले जात होते. आज रालोआचा दुबळा घटक पक्ष म्हणून आसाम गण परिषदेकडे पाहिले जात आहे. एक काळ असा होता की, भाजपने आसाम गण परिषदेचा ज्युनिअर सहकारी म्हणून राज्यात पाय रोवले होते. मात्र, आज मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात भाजपचा विस्तार झाला आहे. हेच सोनोवाल कधी काळी एजीपीमध्ये होते. तेच आज भाजपचे राज्यात नेतृत्व करत आहेत. रालोआ जिंकणार की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दहा पक्षांची महाआघाडी हा प्रश्न अनुत्तरित असला तरी एजीपी पूर्वीपेक्षा अधिक कमजोर होऊ शकतो. भाजपकडून २६ जागा मिळविण्यात हा पक्ष यशस्वी ठरला असला तरी यातील बहुतांश जागा जिंकणे अवघड आहे. (The struggle for the existence of the Assam Gana Parishad; The challenge of the Congress front, the BJP's ally became weak) 

एजीपीसाठी का आहे जागा जिंकणे अवघड ? एजीपी आमदारांच्या जागा भाजपने त्यांच्याकडून काढून घेतल्या आहेत. यात माजी मुख्यमंत्री आणि एजीपीचे संस्थापक प्रफुल्ल महंत यांच्या जागेचाही समावेश आहे. महंत यांची प्रकृती सध्या बरी नाही. तथापि, पक्षाचे अध्यक्ष अतुल बोरा यांनी महंत यांची जागा भाजपला देण्यास सहमती दर्शविल्याने महंत यांचे समर्थक नाराज आहेत. 

कारण, काँग्रेसकडून सुरेश बोरा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ते २०१६ मध्ये महंत यांच्याकडून पराभूत झाले होते. महंत यांचे समर्थक मतदार रालोआच्या विरोधात मतदान करतील तर सत्ताधारी आघाडीसाठी तो धक्का ठरू शकतो. 

- एजीपीने मागील वेळी ज्या जागा जिंकल्या होत्या त्यात कमलपूर, लखीमपूर, नाहरकटिया आणि पटाचारकुची यांचा समावेश आहे. या जागा आता भाजपने आपल्याकडे घेतल्या आहेत. - पटाचारकुची हा मतदारसंघ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजीत दास यांनी एजीपीकडून घेतला आहे. - भाजपने गतवेळच्या आपल्या ८ जागा एजीपीला दिल्या आहेत. मात्र, काँग्रेस - एआययूडीएफ आघाडीमुळे या जागा जिंकणे अवघड झाले आहे. कारण, हे मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत. 

- २०१६ च्या आकड्यांचा आधार घेतला तर काँग्रेस- एआययूडीएफचे मते संयुक्तपणे ५४ टक्क्यांवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेस आणि एआययूडीएफ यांच्यात मतांची विभागणी झाली होती. काँग्रेसने ३१ टक्के, तर एआययूडीएफने २३ टक्के मते घेतली होती, तर भाजप-एजीपीला ४१.९ टक्के मते मिळाली होती. 

- राहा, बभनीपूर, नोबोइचा या मतदारसंघात एजीपी काट्याची लढत देऊ शकते.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेस