शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 04:51 IST

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा ...

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा अभिमान म्हणून या पक्षाकडे बघितले जात होते. आज रालोआचा दुबळा घटक पक्ष म्हणून आसाम गण परिषदेकडे पाहिले जात आहे. एक काळ असा होता की, भाजपने आसाम गण परिषदेचा ज्युनिअर सहकारी म्हणून राज्यात पाय रोवले होते. मात्र, आज मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात भाजपचा विस्तार झाला आहे. हेच सोनोवाल कधी काळी एजीपीमध्ये होते. तेच आज भाजपचे राज्यात नेतृत्व करत आहेत. रालोआ जिंकणार की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दहा पक्षांची महाआघाडी हा प्रश्न अनुत्तरित असला तरी एजीपी पूर्वीपेक्षा अधिक कमजोर होऊ शकतो. भाजपकडून २६ जागा मिळविण्यात हा पक्ष यशस्वी ठरला असला तरी यातील बहुतांश जागा जिंकणे अवघड आहे. (The struggle for the existence of the Assam Gana Parishad; The challenge of the Congress front, the BJP's ally became weak) 

एजीपीसाठी का आहे जागा जिंकणे अवघड ? एजीपी आमदारांच्या जागा भाजपने त्यांच्याकडून काढून घेतल्या आहेत. यात माजी मुख्यमंत्री आणि एजीपीचे संस्थापक प्रफुल्ल महंत यांच्या जागेचाही समावेश आहे. महंत यांची प्रकृती सध्या बरी नाही. तथापि, पक्षाचे अध्यक्ष अतुल बोरा यांनी महंत यांची जागा भाजपला देण्यास सहमती दर्शविल्याने महंत यांचे समर्थक नाराज आहेत. 

कारण, काँग्रेसकडून सुरेश बोरा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ते २०१६ मध्ये महंत यांच्याकडून पराभूत झाले होते. महंत यांचे समर्थक मतदार रालोआच्या विरोधात मतदान करतील तर सत्ताधारी आघाडीसाठी तो धक्का ठरू शकतो. 

- एजीपीने मागील वेळी ज्या जागा जिंकल्या होत्या त्यात कमलपूर, लखीमपूर, नाहरकटिया आणि पटाचारकुची यांचा समावेश आहे. या जागा आता भाजपने आपल्याकडे घेतल्या आहेत. - पटाचारकुची हा मतदारसंघ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजीत दास यांनी एजीपीकडून घेतला आहे. - भाजपने गतवेळच्या आपल्या ८ जागा एजीपीला दिल्या आहेत. मात्र, काँग्रेस - एआययूडीएफ आघाडीमुळे या जागा जिंकणे अवघड झाले आहे. कारण, हे मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत. 

- २०१६ च्या आकड्यांचा आधार घेतला तर काँग्रेस- एआययूडीएफचे मते संयुक्तपणे ५४ टक्क्यांवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेस आणि एआययूडीएफ यांच्यात मतांची विभागणी झाली होती. काँग्रेसने ३१ टक्के, तर एआययूडीएफने २३ टक्के मते घेतली होती, तर भाजप-एजीपीला ४१.९ टक्के मते मिळाली होती. 

- राहा, बभनीपूर, नोबोइचा या मतदारसंघात एजीपी काट्याची लढत देऊ शकते.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेस